मुंबई | शबनम न्यूज
“स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी अनेक गोष्टी लिहून ठेवल्या आहेत. ते उत्तम लेखक आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी या गोष्टी लिहून ठेवल्या असतील आणि त्यातीलच एका वाक्य उचलून शिवानी वडेट्टीवारांनी मांडलं असेल, तर त्याला विरोध करायचं कारण नाही. परंतु, समजा सावरकरांनी लिहिलं नसेल आणि शिवानी वडेट्टीवारांनी ते मांडलं असेल तर निश्चितपणे त्यांना माफी मागायला लावू,” अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी व्यक्त केली.
प्रदेश युवक काँग्रेसच्या सचिव आणि माजी मंत्री विजय विडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी सावकारांविरोधात वक्तव्य केले. त्या म्हणाल्या होत्या की, ““हे लोक फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांवर कधीच मोर्चा काढणार नाहीत. ते सावरकर मोर्चा काढतात. मला आणि माझ्यासह इतर भगिनी महिलांना भीती वाटत असेल. सावरकर म्हणायचे बलात्कार हे राजकीय शस्त्र आहे. ते तुम्ही तुमच्या विरोधकांच्या विरोधात वापरलं पाहिजे. मग माझ्यासारख्या महिला-भगिनींना सुरक्षित कसं वाटेल? अशा लोकांच्या प्रचारासाठी हे लोक मोर्चा काढतात”, असं शिवानी वडेट्टीवार चंद्रपूरच्या एका कार्यक्रमात म्हणाल्या.