शबनम न्युज | पिंपरी
“आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याशिवाय राजकारण आणि राजकारणाशिवाय पवार साहेब यांची कल्पना होऊ शकत नाही, आदरणीय पवार साहेबांच्या शिव,फुले, शाहू, आंबेडकर या विचारधारेमुळे आम्ही राजकारणात आलो, आता देवच देव्हाऱ्यात नसेल तर त्याची पूजा करून काय फायदा? अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष इम्रान शेख यांनी दिली आहे.
आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये भाषणाच्या शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पदावरून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर अनेक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांपाठोपाठ आपणही राजीनामा देत असल्याचे जाहीर केलं. दरम्यान, पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस वतीने ही शरद पवार यांनी राजीनामा परत घेतला नाही तर शहरातील युवक, पदाधिकारी सामूहिक राजीनामे देणार असल्याचेही यावेळी इम्रान शेख यांनी सांगितले.
ते म्हणाले, “आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याशिवाय राजकारण आणि राजकारणाशिवाय पवार साहेब याची कल्पना होवू शकत नाही. आदरणीय पवार साहेबांच्या शिव फुले शाहू आंबेडकर या विचारधारेमुळे आम्ही राजकारणात आलो. आता देवच नसेल देव्हाऱ्यात नसेल तर त्याची पूजा करून काय फायदा तर त्याची पूजा करून काय फायदा ? सध्या देशातील एकूणच परिस्थिती पाहता महाराष्ट्रातील तसेच देशातील अल्पसंख्याक समाज आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कडे मोठ्या आशेने पाहत आहे आदरणीय पवार साहेब ही अल्पसंख्याक समाजाची शेवटची आशा आहे. जर आदरणीय शरद पवार साहेबांनी राजीनामा परत घेतला नाही तर शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या समवेत आम्ही पिंपरी चिंचवड शहरातील युवक पदाधिकारी सामूहिक राजीनामे देणार आहोत.” असे इम्रान शेख यांनी सांगितले.