शबनम न्युज | मुंबई
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांच्या आत्मचरित्र ‘लोक माझे सांगाती’ हे पुस्तक प्रकाशित केले. आता या पुस्तकाचा दुसरा भागही प्रकाशित झाला आहे. या पुस्तकामध्ये शरद पवार यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले, तसेच त्यांनी विविध घटनेचा खुलासा देखील केला, तसेच या आत्मचरित्रातून महाविकास आघाडी आणि शिवसेनेबाबतही भूमिका मांडली आहे. तर मुंबई महाराष्ट्रातून वेगळी करण्याच्या चर्चांवरही पवारांनी स्पष्टपणे मत व्यक्त केले. यावर उद्धव ठाकरेंनी आपले स्पष्टीकरण दिले आहे.
शरद पवार यांनी पुस्तकात मांडलेल्या मतासंदर्भात उद्धव ठाकरेंनी प्रश्न विचारण्यात आला आहे होता. त्यावर त्यांनी भूमिका स्पष्ट केली, तसेच महाविकास आघाडीला तडा जाणार नाही, असेही स्पष्ट केले. “मी माझ्या मतावर ठाम आहे, मी माझी मतं यापुढेही ठामपणे मांडत राहणार आहे, मात्र महाविकास आघाडीला माझ्याकडून कुठेही तडा जाणार नाही, एवढी काळजी मी घेईल,” असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.