पुणे : शबनम न्यूज
जनमानसामध्ये भाजप ची प्रतिमा खराब झाली असल्याची टीका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज पुण्यात केली, कर्नाटक निवडणुकीवरून हे लक्षात आलेले आहे की जनमानसामध्ये भाजपची प्रतिमा आता खराब झाली आहे यापुढे मतदार भाजपला मतदान करणार नाही, सुरुवात कर्नाटक पासून झाली, संपूर्ण देशात असा एकही पक्ष नाही की जो संपूर्ण देशात लढेल म्हणून त्या त्या घटक पक्षांना एकत्र घेऊन आघाडी करून निवडणूक लढण्याचे प्रयत्न राष्ट्रीय स्तरावर सुरू असल्याची माहिती शरद पवारांनी दिली. यावेळी पत्रकारांशी बोलताना पवार यांनी सांगितले की कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या शपथविधी सोहळ्याला आपण उपस्थित राहणार आहोत.
पुण्यामध्ये डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या महा अधिवेशन सभेनंतर पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवार यांनी सांगितले की कर्नाटक निवडणुकीनंतर विरोधकांना एकत्र आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत वेगवेगळ्या राज्यातील घटक पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू आहे अनेक पक्षांचा प्रतिसाद मिळत आहे काही दिवसापूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बैठक आयोजित करणार असल्याचे जाहीर केले होते त्यानुसार बैठक निश्चित झाली की घटक पक्षाचे नेते त्यासाठी उपस्थित राहतील