शबनम न्युज | मुंबई
मान्सून आता सर्वत्र दाखल झाला आहे. महाराष्ट्रात उशिराने दाखल झालेला मान्सून गेल्या दोन दिवसांपासून दमदार हजेरी लावत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाल्याचे दिसून आले. दरम्यान हवामान खात्याने मान्सून बाबत महत्त्वपूर्ण अपडेट दिली आहे. राज्यात आज मंगळवारी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या 24 तासात नाशिकसह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातही सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढल्याने राज्यात 27 आणि 28 जून रोजी नारंगी आणि पिवळा अलर्ट असेल, तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही महत्त्वाच्या भागात आणि कोकणात मुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान 29 आणि 30 जून रोजी महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार आहे. मात्र यावेळी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला नाही.