शबनम न्यूज | मुंबई
ऑपरेशन लोटस वगैरे काही नाही, त्यांचं ऑपरेशन झालं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षांमध्ये भाजपाने फूट पाडल्यामुळे महाराष्ट्रातच नाही तर देशात भाजपाच्या इज्जतीचे आणि प्रतिष्ठेचे वस्त्रहरण झाले आहे, त्यांची वैचारिक सुंता झालेली आहे. हे स्पष्ट दिसत आहे, अशी बोचरी टीका खासदार संजय राऊत यांनी भाजपवर केली आहे.
“कालपर्यंत तुम्ही ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत होतात, आज ते तुमच्या बरोबर आहेत. मुलुंडचे पोपटलाल काय काय बोलले आठवा. असेही संजय राऊत म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “ज्या लोकांना फोडले त्यांना घेऊन निवडणूक जिंकता येत नाही, याची खात्री पटत नाही तोपर्यंत हे निवडणुका लावणार नाहीत. पण मी देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या गटांना सांगू इच्छितो की, तुम्ही कितीही लोक फोडा. मुंबई महापालिकेवर आणि ठाणे महापालिकेवर शिवसेनेचा भगवाच फडकणार आणि आत्ताच निवडणुका घ्या. अंदाज कसले व्यक्त करत आहात. ज्योतिषांचे पंचांग घेऊन बसला आहात का? उद्या निवडणुका घ्या. आमची तयारी आहे, असेही संजय राऊत म्हटले.