शबनम न्युज | नवी दिल्ली (वृत्तसंस्था)
“काही दिवसांपूर्वी मी मणिपूरला गेलो होतो. आमचे पंतप्रधान गेले नाहीत, आजही गेले नाहीत, कारण त्यांच्यासाठी मणिपूर हा भारत नाही. मी ‘मणिपूर’ हा शब्द वापरला, पण सत्य हे आहे की मणिपूर आता राहिले नाही. तुम्ही मणिपूरचे दोन तुकडे केलेत. तुम्ही मणिपूरचे विभाजन करून तोडले आहे. मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या तुम्ही केली, तुम्ही देशद्रोही आहात. तुम्ही भारत मातेची हत्या केलीय,” असे विधान काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी आज संसदेत मांडले आहे.
ते म्हणाले, मी मणिपूरला गेलो, पंतप्रधान आजपर्यंत गेले नाहीत. मणिपूर आपल्या देशात नाही असं त्यांना वाटते. रिलिफ कॅम्पमध्ये महिलांशी संवाद साधला. मोदींसाठी मणिपूर भारतात नाही. जनतेचे ऐकायचे असेल तर अहंकार सोडावा लागेल. मोदींनी मणिपूरचे विभाजन केले. महिलेच्या डोळ्यासमोर त्याच्या मुलाला गोळ्या घातल्या, रात्रभर ती मृतदेहासोबत राहिली. मी खोटे बोलत नाही तर तुम्ही खोटे बोलताय, अशी टीका ही राहुल गांधी यांनी केली आहे.
पुढे ते म्हणाले, वेळ आली तर भारतीय लष्कर मणिपूरमध्ये शांतता आणू शकते. पंतप्रधान मणिपूरचं काही ऐकत नाही. मणिपूरमध्ये तुम्ही माझ्या आईची हत्या केलीय, नरेंद्र मोदी केवळ २ व्यक्तींचे ऐकतात,एक अमित शाह आणि गौतम अदानी असे टीकास्त्र यावेळी राहुल गांधींनी मोदींवर केले आहे.
#WATCH | Congress MP Rahul Gandhi says, "A few days back, I went to Manipur. Our PM didn't go, not even to this day, because for him Manipur is not India. I used the word 'Manipur' but the truth is that Manipur does not remain anymore. You have divided Manipur into two. You have… pic.twitter.com/QodCZnLHWs
— ANI (@ANI) August 9, 2023
Advertisement