शबनम न्यूज , प्रतिनिधी :
पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक – १५ मधील नाल्याची सीमा भिंत बांधणे व नाल्या वर सुरक्षा रक्षक लोखंडी जाळी बसविण्याची मागणी विठ्ठल प्रतिष्ठान चे संस्थापक निखिल दळवी यांनी केली आले दिलेल्या निवेदनात दळवी यांनी नमूद केले आहे कि गंगानगर येथील गोविंदराव भिकू पांढरकर उद्यान शेजारील नाल्याच्या सीमा भिंतीवरील जाळ्या तुटल्या आहेत व सुरक्षारक्षक भिंती देखील तुटून पडल्या आहेत सदर नाल्याच्या शेजारी वाहत रस्ता आहे व उद्यान आहे त्या उद्यान मध्ये लहान मुले खेळण्यासाठी येत असतात नाल्यावरील सुरक्षारक्षक भिंत पडली आहे व लोखंडी जाळ्या तुटल्या आहेत त्यामुळे कोणीही नाल्यामध्ये पडून अपघात होऊ शकतो सदर नाल्याच्या भिंतीन वर लोखंडी जाळ्या नसल्यामुळे या ठिकाणचे नागरिक नाल्यांमध्ये कचरा टाकत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात कचरा साठला आहे व त्या मुळे नाल्या लगतच्या परिसरात दुर्गंधी पसरत आहे व नाल्या च्या आसपासच्या परिसरात डास मच्छर यांचे साम्राज्य तयार झाले आहे त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते सदर उद्यान शेजारील नाला रस्त्याच्या पलीकडील बाजूस दळवी नगर रेल्वे पटरी कडे जाणाऱ्या नाल्याचे काँक्रिटीकरण करावे व सीमा भिंत बांधून सुरक्षा रक्षक जाळी बसवावी जेणेकरून नाल्यामध्ये कोणीही कचरा टाकणार नाही तरी या सर्व बाबी लक्षात घेता सदर नाल्या वरील पडलेल्या सीमा भिंती बांधाव्यात व सुरक्षारक्षक लोखंडी जाळ्या बसवाव्या व दळवी नगर कडे जाणाऱ्या नाल्याचे काँक्रिटीकरण करावे असे निवेदनात सांगण्यात आले आहे.