शबनम न्युज | प्रतिनिधी
जळगाव: जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासंदर्भात शांततेत आंदोलन करीत असलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार करीत गोळीबार, अश्रुधुराचा वापर केला. सर्वकाही शांततेत आंदोलन सुरू असताना पोलिसांना लाठीमार करण्याचा आदेश कोणी दिला, अश्रुधुराच्या नळकांड्या का फोडल्या, असे प्रश्न राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केले. महिला, मुलांवरही लाठीमार केल्याची ही घटना निंदनीय असून, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
पोलिसांकडूनच अगोदर कारवाई झाली. लाठीमार करण्यापूर्वी गृह मंत्रालयाकडून आदेश व्हावा लागतो. या घटनेसंदर्भात सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहनही आमदार पवार यांनी केले.
Advertisement