शबनम न्युज | मुंबई
’40 व्या दिवशी आम्हाला आरक्षण पाहिजे, यावर आम्ही ठाम आहोत. सरकारने मराठ्यांना कस आरक्षण द्यायचं, ते त्यांनी ठरवावं. मराठा आरक्षणावर कायमचा तोडगा काढण्यासाठी सरकारला 40 दिवसांची मुदत दिली होती. आता या 40 व्या दिवशी आम्हाला आरक्षण पाहिजे, कसं द्यायचं ते त्यांनी ठरवावं,’ असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे.
मराठा समुदायाला टिकणारे आरक्षण देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्यानंतर मराठा आंदोलकी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले आहे. सरकारने एक महिन्याचा अवधी मागितला होता, पण जरांगे यांनी मराठा आरक्षणावर कायमचा तोडगा काढण्यासाठी सरकारला 40 दिवसांची मुदत दिली होती. त्यानंतर आज मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.
“सरकारचं मत होतं की, समितीचा अहवाल सादर करून आम्ही मराठ्यांना टिकणारं आरक्षण देतो. आम्हाला एक महिन्याचा वेळ द्या. आपण त्यांना तसा वेळ दिला आहे. आता पुरावेही आढळले आहेत. मराठ्यांना आरक्षण कसं द्यायचं, ते सरकारने ठरवायचं आहे. मात्र ४० व्या दिवशी आम्हाला आरक्षण पाहिजे. यावर आम्ही ठाम आहोत,” असंही जरांगे पाटील म्हणाले.