शबनम न्युज | मुंबई
भारताच्या हरितक्रांतीचे जनक, पद्मविभूषण डॉ. एम, एस. स्वामीनाथन यांचे आज दुःखद निधन झाले. त्यांचे वय 98 वर्ष होते. तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथे आज सकाळी 11:20 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा जन्म 7 ऑगस्ट 1925 रोजी झाला होता. ते भारतातील हरितक्रांतीचे जनक म्हणून ओळखले जात होते.
स्वामीनाथन यांची गणना भारतातील महान कृषी शास्त्रज्ञांपैकी एक म्हणून केली जाते. त्यांनी भाताची अशी विविध विकसित केली, ज्यामुळे भारतातील कमी उत्पन्न असलेल्या शेतकऱ्यांना अधिक धान्याचे उत्पादन करता आले.
कृषीशास्त्रज्ञ डॉ.स्वामीनाथन यांनी हरितक्रांती यशस्वी करण्यासाठी दोन केंद्रीय कृषी मंत्री श्री सुब्रमण्यम (1964- 67 ) आणि जगजीवन राम (1967 आणि 1974 -77 ) यांच्यासोबत काम केले. यामध्ये रासायनिक जैविक तंत्रांनाद्वारे गहू आणि तांदळाचे उत्पादकता वाढवली. हरितक्रांतीमुळे भारताचे चित्र बदलले.