शबनम न्युज | प्रतिनिधी
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पालकमंत्रिपद आल्याने पिंपरी चिंचवड मधील रखडलेली बंदिस्त जलवाहिनी योजना, विस्कळीत पाणीपुरवठा, पुनावळे येथील कचरा डेपोच्या जागेच्या प्रश्नांसह विविध प्रलंबित प्रश्नांना गती मिळण्याची शक्यता आहे.
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आल्याने आता पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कारभारात त्यांचाच शब्द अंतिम राहील. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पवार यांनी महापालिकेत तीन तास बैठक घेत प्रशासनाची झाडाझडती घेतली होती. शिवसेनेचे खासदार, भाजपचे आमदार बैठकीपासून अलिप्त होते. गैरव्यवहाराचा आरोप झालेल्या कामांचे लेखापरीक्षण करणार असल्याचे पवार यांनी जाहीर केले होते.आयुक्त शेखरसिंह यांना काही प्रश्न दिले होते. पण, त्याची उत्तरे त्यांना मिळाली नाहीत. पालकमंत्रिपद नसल्याने पवार यांना पालिकेतील कामात लक्ष घालण्यात मर्यादा येत होत्या. आता महापालिकेच्या प्रशासकांना त्यांच्याच कलानुसार काम करावे लागणार आहे. पवार यांचाच शब्द अंतिम राहील.