शबनम न्युज | मुंबई
भारताचे महान फिरकीपटू बिशन सिंह बेदी यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले. 1967 ते 1979 या कालावधीत त्यांनी भारतासाठी 67 कसोटी सामन्यात प्रतिनिधित्व केले आणि 266 विकेट्स घेतल्या. 10 वन डे सामन्यात त्यांच्या नावावर 7 विकेट्स आहेत, बेदी उत्तम डावखुरे फिरकीपटू तसेच उत्तम कर्णधार होते. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने 1976 मध्ये वेस्टइंडीज विरुद्धच्या कसोटीत चारशे धावांची आव्हान पार केले होते.
भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये बेदी प्रथम उत्तर पंजाब साठी खेळले. जेव्हा ते फक्त पंधरा वर्षाचे होते आणि 1968 ते 69 मध्ये ते दिल्लीला गेले आणि 1974 ते 75 च्या रणजी करंडक स्पर्धा त्यांनी गाजवली व 64 बळी घेतले. बेदी यांनी अनेक वर्ष इंग्लिश कवटी क्रिकेटमध्ये नॉर्थम्प्टनशायरचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 1560 विकेट सह आपली कारकीर्द पूर्ण केली.
त्यांना 1970 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि 2004 मध्ये सी. के. नायडू जीवन गौरव पुरस्कारही त्यांना देण्यात आला.