डोणे दि. ०२ वार्ताहर :
डोणे येथील ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची धुळवड सुरु झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. ग्रामदैवत श्री डोणुआई ग्रामविकास परिवर्तन विकास पॅनलचा प्रचार सुरु झाला आहे. पॅनेल प्रमुखांनी आणि सर्व मतदारानी एकत्र येवून प्रचाराचा नारळ ग्रामदैवतेच्या मंदिरात फोडून प्रचारास सुरुवात केली आहे.यावेळी मतदारांची गर्दी पाहून उमेदवारांना हुरूप आल्याचे बोलले जात आहे.यावेळी पॅनलप्रमुखांशी बोलताना त्यांनी सांगितले की आम्ही या निवडणुकीत मतदारांना दिलेली आश्वावासाने कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करणार आणि गावात समाजकारणाच्या माध्यमातून विकास साधणार आहोत.यावेळी आम्ही बौध्वस्तीत प्रशस्त बुध्दविहार ,रस्ता,तयार करणे तसेच गणपती विसर्जन घाट तयार करून विसर्जन विहिरीची दुरुस्ती करणे ,जेष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्राची उभारणी करणे, कॉन्क्रीट रस्ता करणे,संबंध डोणे गावात गाव व वाडी वस्तीवर सौर दिवे बसविणे,गावातील सर्वच धार्मिक स्थळे व महत्वाची ठिकाणे येथे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सीसीटीव्ही बसविणे,महाविद्यालयात जाणाऱ्या युवकांना स्पर्धा परीक्षा बाबत वेगवेगळ्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळण्यासाठी व्याख्याने आयोजित करणे,नळ योजनेचा विस्तार करून प्रत्येक घरी नळ पोहोचविणे, वाघमारे वस्तीवर समाजमंदिर व सभाग्रह बांधने,गावात सार्वजनिक वाचनालय व व्यायाम शाळा उभी करणे, शाळांचे नवीन खोल्यांचे बांधकाम करणे आदी कामावर आमचे बारीक लक्ष ठेवून हे सर्वच कामे येत्या कार्यकालात मार्गी लावणे,गावातील अंतर्गत रस्ताच्या दोन्ही बाजूला बंदिस्त गटार योजना राबवणे हा आमचा मुख्य उद्देश असणार आहे.त्यामुळे आम्ही सर्व उभ्या केल्याल्या उमेदवारांना मतदारांनी मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहनही यावेळी श्री डोणुआईदेवी ग्रामदैवत परिवर्तन ग्रामविकास पॅनलच्या पदाधिकाऱ्यानी केले आहे.या पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार हभप अशोक पंडू कारके हे आहेत.
अशोक कारके सांप्रादायिक क्षेञातील एक आध्यात्मिक व्यक्तीमहत्व,मावळ-मुळशी तालुकातील एक सुप्रसिद्ध नाव,गांवातील प्रत्येक कुंटुबांच्या सुख-दुखा:त सहभागी होणारे अशोकमहाराज कारके यांच्या उमेदवारीमुळे डोणे गांवात नवचैतन्य निर्माण झाले आहे.साहजिकच त्यांच्या निवडीने गांवात विकासकामे चांगल्या जोमाने होण्यास मदत होईल.
वार्ड 1 मधून विलास काळू वाघमारे,नीता रवींद्र काळभोर, स्वाती आरुठे ,वार्ड 2 मधून योगेश बबन कारके, स्वाती हिरामण आरूटे,वार्ड 3 मधून समीर नामदेव खिलारी,व उज्जवला सागर खिलारी हे उमेदवार रिंगणात असणार आहेत.