आमदार अश्विनीताई जगताप यांचा सकारात्मक प्रतिसाद .
कोणत्याही परिस्थतीत पुनावळे येथे कचरा डेपो होऊ देणार नाही,आमदार अश्विनी जगतापांचा ग्रामस्थांना शब्द
शबनम न्यूज, प्रतिनिधी :
पिंपरी चिंचवड शहरातील पुनावळे गावातील कचरा डेपो रद्द करावा अशी मागणी बऱ्याच वर्षापासून पुनावळे ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे. पुनावळे कचरा डेपो चा हा प्रश्न आगामी हिवाळी अधिवेशनात मांडावा व पुनावळे कचरा डेपो रद्द करावा अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने भाजप शहर उपाध्यक्ष नवनाथ ढवळे यांनी आमदार अश्विनीताई जगताप यांच्याकडे केली आमदार अश्विनी जगताप यांनी नवनाथ ढवळे यांच्या मागणीची दखल घेत आपण कोणत्याही परिस्थितीत पुनावळे येथे कचरा डेपो होऊ देणार नाही अशा शब्द पुनवळ्या ग्रामस्थांना दिला.
पूनावळे कचरा डेपो हटाव कृती समिती आणि पूनावळे ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रस्तावित पूनावळे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी रविवार, दिनांक ५ नोव्हेम्बर रोजी सकाळी १०-१२ वा. बाइक रैली चे आयोजन करण्यात आले . सदर रॅली ला अतिशय उस्फुर्त प्रतिसाद पूनावळेकर, ग्रामस्थ आणि नागरिकांनी दिला. हजारोंच्या संख्येने सर्वांनी ह्या कचरा डेपो रद्द करण्याची मागणी चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या आमदार आमदार अश्विनी ताई जगताप यांच्या कडे केली
या बाबत लवकरात लवकर एक पूनावळे येथील शिष्टमंडळ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि वनमंत्री यांची भेट घेऊन त्वरित निर्णय घेऊ असे हि आश्वासन अस्विनी जगताप यांनी दिले . त्याच बरोबर या संपूर्ण आंदोलनाला त्यांनी पूर्ण पाठिंबा दर्शवला तर . वेळ पडली तर त्या सुद्धा ह्या आंदोलनात सहभागी होतील ही ग्वाही दिली.
.
या रॅली मध्ये आणि चिपको आंदोलनात पूनावळे, ताथवडे, मारुंजी, जांबे, हिंजवडी, लाइफ रिपब्लिक टाउनशिप, वाकड या परिसरातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.
सध्या पूनावळे परिसरात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झालेले असुन ते अजूनही सुरूच आहे. सुमारे १ लाखाहुन अधिक नागरिक सध्या पूनावळे येथे राहत आहेत.
येथील नैसर्गिक वातावरण, शेजारी असलेले हिंजवडी आय टी पार्क यामुळे नागरिक या ठिकाणी राहण्यासाठी प्राधान्य देत आहेत, परंतु तेच आता घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामुळे खराब होण्याची वेळ येताना दिसत आहे. सदर प्रस्तावित प्रकल्पापासून विविध इमारती, गृहनिर्माण सोसाइटी, खुप कमी अंतरावर (२०० – ४०० मीटर) आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा अतिशय गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो.
प्रस्तावित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प हा जंगलाच्या अगदी कडेला लागून उभारण्याचा विचार करण्यात आलेला आहे ज्यामुळे प्रचंड नैसर्गिक हानी होईल आणि नैसर्गिकरित्या लाभलेलं निसर्गसौंदर्य नष्ट होईल. तसेच पुनावळे येथील बंधाऱ्या मधून संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरास पाणीपुरवठा केला जातो. या प्रकल्पामुळे शहरातील सर्व नागरिकांना दुषित पाणी पुरवठा होण्याची दाट शक्यता आहे.
प्रस्तावित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प हा पश्चिम दिशेला आहे. सामान्यतः वर्षभर वारे हे नेहमी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात आणि म्हणून याचा परिणाम पुनावळेसोबतच जवळच असलेल्या वाकड, ताथवडे, हिंजवडी आय टी पार्क, मारुंजी, मुंबई पुणे महामार्गासारख्या आधीच विकसित असलेल्या परिसरात देखील होण्याची दाट शक्यता आहे.