शबनम न्युज | करमाळा
मनोज जरांगे पाटील यांचा तिसऱ्या टप्प्यातील राज्यव्यापी दौरा सुरू झाला आहे. दरम्यान, आज गुरुवारी सकाळी ४ वाजता करमाळा येथील वांगी येथे मनोज जरांगे पाटील यांची सभा पार पडली. सकाळी ४ वाजता देखील त्यांच्या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी होती. हजारोच्या संख्येने मराठा बांधवानी या सभेला गर्दी केली होती.
बुधवारी संध्याकाळी ७ वाजता ही सभा पार पडणार होती, मात्र मनोज जरांगे पाटील आज सकाळी ४ ला पोहचले असता, सकाळी त्यांनी सभा घेतली. मात्र तरीही हजारोच्या संख्येने या सभेला नागरिकांनी गर्दी केली होती. बुधावारी सायंकाळी ही सभा होणार असल्याने दुपारपासूनच मराठा समाज हजारोंच्या संख्येने जमायला सुरूवात झाली होती. इंदापुर येथील लोक या सभेसाठी पोहोचले होते. सभेसाठी लाखाच्या आसपास लोक जमले होते. परंतु, मनोज जरांगे यांना पोहोचण्यासाठी उशीर झाला. ते पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास पोहोचले.
मनोज जरांगे यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. पहाटे ४ वाजताही कडाक्याच्या थंडीत सभा घेतली. ४ ते ५ मिनिटे मनोज जरांगे बोलले. मराठा समाजाला आरक्षण मिळेल, तेव्हा ही करमाळ्याची सभा कायम लक्षात राहील. तुमचे जे प्रेम आहे, ऋण आहे ते हा मराठा समाज कधीही विसरणार नाही, असे मनोज जरांगे यांनी सांगितले.
यानंतर आता दौड, मायणी. सांगली, कोल्हापूर, इस्लामपूर, कराड, सातारा, मेंढा, वाईस रायगड, रायगड, महाड, मुळशी, आळंदी, तुळापूर, खालापूर, कल्याण, ठाणे, पालघर, नाशिक, त्रंबकेश्वर, विश्रांतगड, संगमनेर, श्रीरामपूर, नेवासा, शेवगाव, भोदेगाव, अवमापूर, धोंडेगाव, या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचा तिसऱ्या टप्प्यातील दौरा असणार आहे.