शबनम न्युज | पुणे
राज्यातील गोरगरिबांना सणासुदीच्या काळात गोडधोड करता यावं, यासाठी राज्य सरकारकडून आनंदाचा शिधा या माध्यमातून काही अन्नपदार्थाचे वाटप अवघ्या शंभर रुपयांमध्ये करण्यात येते. मात्र, या आनंदाचा शिधा या अन्नपदार्थांमध्ये निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ दिले, असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या फेसबुक वर एक पोस्ट शेअर केली असून त्यात म्हटले आहे की, गोरगरीब जनतेला दिवाळी सणासाठी दिला गेलेला आनंदाचा शिधा हा खाण्यात अयोग्य असल्याचे निदर्शनास आले आहे. डाळी मध्ये किडे, रव्यामध्ये जाळ्या, निकृष्ट दर्जाचे पामतेल अशा पद्धतीचे साहित्य वाटण्यात आले. ही गोरगरीब जनतेची शासनाने केली कृर अशी थट्टा आहे. गोरगरिबांच्या दिवाळीची अशी थट्टा करणाऱ्या शासनाचा तीव्र निषेध. असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारचे निषेध व्यक्त केला आहे.