प्रतिनिधी, पुणे :
“ परमपूज्य स्वामी गोविंददेव महाराज व अन्य साधुसंत यांच्या आशीर्वाद व मार्गदर्शना मुळेच आपण कार्य करीत असताना न्यायपूर्ण निर्णय देण्यास सक्षम होते. कारण निरपेक्ष बुद्धीने व सामाजिक जाण असणारे संत आपल्याला योग्य काय व अयोग्य काय याचे ज्ञान देतात” असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले संत श्री ज्ञानेश्वर गुरुकुल, महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान,श्रीकृष्ण सेवा निधी व गीता परिवार आयोजित धर्मश्री अन्नकुट या कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना बोलत होत्या.
हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अयोध्येत श्री राम मंदिर याबाबतच्या भुमिकेचे स्मरण करून त्यांचे स्वप्न आता सर्व हिंदुधर्म सेवकांनी पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वीखाली पुर्ण केल्याबद्दल प्रशंसा केली.
या प्रसंगी मार्गदर्शन करतांना प.पू स्वामी गोविंददेव गिरिजी महाराज यांनी “भगवान श्री कृष्ण” यांनी पारंपारिक पूजे ऐवजी सर्व सामन्यांच्या उपयोगातील पूजनीय जसे गाय,वृक्ष,डोंगर,या निसर्ग देवतांची पूजा करण्यासाठी गोवर्धन पर्वताची पुजा करायला सांगितले . यापुजेत सर्व लहान थोर गरीब श्रीमंत सर्व जाती जमाती यांचा सहभाग घेवून आपलाही सहयोग द्यावा असे सांगितले . त्याच प्रमाणे आयोध्येत निर्माण होणाऱ्या राम मंदिर कार्यात आपला यथाशक्ती सहयोग द्यावाअसे आवाहन केले. प.पु. गोविंदगिरी महाराजांनी आता मंदिर बनणे हा संघर्ष संपलेला आहे , कारण मंदिर होणारच आहे तेंव्हा सर्व समाजांनी एकत्र येवून बंधुभाव वाढविण्यासाठी कार्य करावे असे प्रतिपादन केले
या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत सामाजिक जाणीवेतून कार्य करणाऱ्या व्यक्तींचा स्वामीजींच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यात सौ.अंजली सुरेश जठार (लेखन),वेद मूर्ती महेशजी नंदे(धर्म शिक्षण),मंदार लक्ष्मण परळीकर(राष्ट्रीय प्रबोधन) तुकाराम गायकवाड(शिक्षक),भूषण नंदकिशोर तोष्णीवाल,प्रा.डॉ.राघव अष्टेकर(क्रीडा व व्यायाम). यांचा समावेश होता.वेदमूर्ती सुजितजी देशमुख गुरुजी यांच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.या सर्व कार्यक्रम प्रसंगी यजमान पराग शेंडे व श्री अभय केले उपस्थित होते.