श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालय डुडुळगाव आळंदी पुणे शुक्रवार दिनांक ०६ डिसेंबर २०२३ रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभाग व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महामानव विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन महाविद्यालयांमध्ये सकाळी नऊ वाजता साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.परमेश्वर भताशे यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.कैलास अस्तरकर (कार्यक्रम अधिकारी रासयो ) यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हंसराज थोरात होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले
प्रमुख उपस्थिती म्हणून श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार माननीय श्री मयूर ढमाले उपस्थित होते. महापारिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख वक्त्ते म्हणून लाभलेले डॉ.सुरेंद्र पवार सर (इतिहास तज्ज्ञ, व्याख्याते) यांनी विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापारिनिर्वाण दिनानिमित्त त्यांनी केलेल्या कार्याचा उल्लेख करत अनेक उदाहरणे देत विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले त्यांनी आपल्या व्याख्यानातून सुरुवातीपासून त्यांनी संपूर्ण समाज शिक्षीत करण्याकरता तसेच समान न्याय आणि त्यांना त्यांचा हक्क मिळवुन देण्याकरता आपले संपूर्ण आयुष्य कसे खर्ची घातले आणि समाजात प्रचलित असमानता दूर करण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम कशाप्रकारे घेतले प्रत्येक प्रसंगाचा त्यांनी कसा सामना केला तसेचबाबासाहेब आंबेडकर हे विद्यार्थ्यांचे प्रेरणास्त्रोत असून, त्यांची शिकवण यानंतरच्या अनेक पिढीसाठी आदर्शवत असणार आहे. शिक्षण म्हणजे वाघिणीचे दूध, असे ते नेहमी म्हणत. सवर्ण शूद्र, उच्च आणि नीच अशी सामाजिक दरी भरून काढत शिक्षणाचा समान हक्क मिळवून देण्याचा कायदा बाबासाहेबांनी आणला, आणि आपल्या सर्वांच्या आयुष्याचे सोने झाले. याबद्दल बहुमोल असे मार्गदर्शन केले.
यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हंसराज थोरात सर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणींना उजाळा देत हिंदू कोड बिल, स्त्री शिक्षण, स्त्रियांचे मुलभूत हक्क, अस्पृश्यता निवारण, जातीभेद निवारण, उच्च-नीच भेदभाव, महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह, तसेच भारतीय संविधान अशी महान कार्ये त्यांनी कशी केली असे अनेक दाखले देत बहुमोल असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे आभार कार्यक्रम अधिकारी प्रा. संजीव कांबळे यांनी मानले व कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली या कार्यक्रमाचे संयोजन प्राध्यापक संजीव कांबळे राष्ट्रीय सेवा योजना विभाग राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी यांनी केले तसेच हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. प्रेरणा पाटील प्रा. डॉ समीना मोमीन , डॉ. प्रीती बुऱ्हाडे, प्रा. सविता मानके प्रा.सोनाली अभंग डॉ.छाया जोशी प्रा.माधवी चौधरी प्रा. यशोदा खुळखुळे प्रा.दिपाली ताम्हाणे प्रा.दिपाली सोनवणे बीबीए विभाग प्रमुख प्रा. शाहूराज येवते, मराठी विभाग प्रमुख डॉ. पांडुरंग मिसाळ,वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. दिलीप बारी तसेच कार्यालयीन कर्मचारी श्री.प्रवीण भावे सर यांचे अनमोल असे सहकार्य लाभले तसेच या कार्यक्रमासाठी रामचंद्र आवटे पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते