शबनम न्युज | पुणे
सर्वसामान्य नागरिक विविध शासकीय कार्यालयांमध्ये निरनिराळ्या कामासाठी जातात ,त्यावेळेस त्यांना अधिकाऱ्यांची भेट घेणे व नावाची व त्यांच्या पदनामाची ओळख होणे आवश्यक असते, परंतु शासकीय कार्यालयामध्ये आपण जर पाहिले तर अधिकारीवर्ग कार्यालयामध्ये ओळखपत्र दर्शनीयभागी लावलेले दिसत नाहीत, याकरिता राज्य शासनातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी ओळखपत्र दर्शनी भागावर लावणे, अशी मागणी सुरज गजानन बाबर (युवानेता: शिवसेना ,उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी पुणे महानगपालिका आयुक्त राहुल महिवाल तसेच मुख्य अभियंता/ प्रादेशिक अधिकारी/कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, पुणे यांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, सर्वसामान्य नागरिक विविध शासकीय कार्यालयांमध्ये निरनिराळ्या कामासाठी जातात ,त्यावेळेस त्यांना अधिकाऱ्यांची भेट घेणे व नावाची व त्यांच्या पदनामाची ओळख होणे आवश्यक असते, परंतु शासकीय कार्यालयामध्ये आपण जर पाहिले तर अधिकारीवर्ग कार्यालयामध्ये ओळखपत्र दर्शनीयभागी लावलेले दिसत नाहीत ,ओळखपत्र बाबत एखाद्या नागरिकांनी विचारणा केली असता अधिकारी वर्ग ओळख दाखवत नाहीत.
त्याचप्रमाणे अधिकारी वर्गाकडे गणवेष नसल्याकारणाने ओळखपत्र लावणे आवश्यक वाटते,जेणेकरून नागरिक , अधिकाऱ्याचे नाव, पदनाम, विभाग पाहू शकतील व त्या त्या कार्यालयाकडे किंवा अधिकाऱ्याकडे संपर्क साधतील व कामाबाबत चौकशी करू शकतील.परंतु अधिकारी वर्ग जाणून-बुजून ओळखपत्र दर्शनीय भागात लावत नसल्याचे आढळून येते.
जे अधिकारी वर्ग किंवा कर्मचारी ओळखपत्र आपल्या दर्शनीय भागावर लावत नाहीत, त्यांना शासन परिपत्रक ७ मे २०१४ रोजी शासनाने परिपत्रक काढून दर्शनीय भागांवर ओळखपत्र लावण्याच्या सूचना केलेल्या आहेत , जे अधिकारी किंवा कर्मचारी सूचनांची अंमलबजावणी करीत नाहीत कामांमध्ये कुचराई करत आहेत अशांवर विभागीय वरिष्ठ अधिकाऱ्यांद्वारे त्यांच्यावर कारवाई करण्याचेही सूचना केलेल्या आहेत.
उपरोक्त ७ मे 2014 च्या परिपत्रकाचे पुनरुचार करीत शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या प्रवेशाच्या वेळी पोलिसांनी त्यांचे काटेकोरपणे तपासणी करून दर्शनीय भागावर ओळखपत्र न लावणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे त्यांच्या संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्याच्या सूचना केलेल्या आहेत
तसेच दर्शनीय भागावर ओळखपत्र न लावणाऱ्या अधिकाऱ्यांवर त्या विभागातील वरिष्ट अधिकाऱ्यांनी कारवाई करून त्यांचा मासिक अहवाल विहीत विवरणपत्रात (परिशिष्ट ‘अ’) सामान्य प्रशासन विभागाला देण्याचे आदेश या परिपत्रकात दिले आहेत.
तरी आपण यासंबंधी आपापल्या विभागामध्ये तात्काळ कार्यवाही करावी जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही, अन्यथा आम्ही शासनाकडे परिपत्रकाचे अंमलबजावणी न करणाऱ्या अधिकाऱ्यांची तक्रार करू कृपया याची आपण प्रामुख्याने नोंद घ्यावी, असेही सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे.