शबनम न्यूज , आळंदी :
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालय डुडुळगाव , आळंदी ,पुणे राष्ट्रीय सेवा योजना युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास व लोकसंख्या नियंत्रण जनजागृती या उपक्रमा अंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबिराचे श्री. क्षेत्र कनेरसर तालुका खेड, जिल्हा पुणे या ठिकाणी उद्घाटन संपन्न झाले.
सदर कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन प्रतिमापूजन व स्वागत गीताने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. संजीव कांबळे यांनी केले.
पाहुण्यांचा परिचय राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. कैलास अस्तरकर यांनी करून दिला. कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन व उद्घाटन सौ सुनीता दत्तात्रय केदारी, सरपंच श्री क्षेत्र कनेरसर यांनी करून राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.
उद्घाटन प्रसंगी श्रीक्षेत्र कनेरसर येथील संजय मोरेश्वर प्रगतशील शेतकरी, विष्णू दौंडकर, संजय दौंडकर ,किरण शहाजी दौंडकर, सागर बाळासाहेब माशेरे ,सिद्धेश दौंडकर, खंडू दौंडकर, पुंडलिक माशेरे ,काळूराम घोडके पत्रकार संपादक तसेच दिलीपराव माशेरे अध्यक्ष पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टी यांनी स्वयंसेवकांना शुभेच्छा दिल्या.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर हंसराज थोरात यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचा इतिहास स्पष्ट करून योजनेतून व्यक्तिमत्व कसे घडते तसेच या योजनेचा भावी आयुष्यात पावलोपावली कसा फायदा होतो या संदर्भात मत व्यक्त केले. महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये सहभाग नोंदविण्याची आवश्यकता का आहे तसेच राष्ट्रीय सेवा योजनेमुळे श्रमदान कल्पकता पडता कार्यकुशलता निर्णय क्षमता इत्यादी मूल्य विद्यार्थ्यांमध्ये कसे रुजतात या संदर्भात विविध उदाहरणांचे दाखले देत बहुमोल मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मयूर मुरलीधर ढमाले खजिनदार श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ यांचे विशेष अनमोल मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमासाठी प्रा राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. दिपाली ताम्हाणे , प्रा. सविता मानके,प्रा. दिपाली सोनवणे ,प्रा विकास दिघे व वैभव बडवे यांची उपस्थिती होती.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परमेश्वर बत्तासे यांनी केले तर उपस्थित पाहुण्यांचे आभार प्रा. दिपाली ताम्हाणे यांनी मानले या कार्यक्रमाची सांगता सामूहिक पसायदानाने झाली अशी माहिती महाविद्यालयाचे प्रसिद्धी प्रमुख प्रा .कसाब यांनी दिली.