शबनम न्यूज | मुंबई
मराठा आरक्षणाचा निर्णय घेताना ओबीसींवर अन्याय झाला, तर ओबीसींचेही आंदोलन सुरू होईल, असा इशारा राज्य सरकारमधील मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी दिला आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी दर्जा देऊन ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील आणि लाखो मराठा आंदोलक करत आहे. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी आज सकाळी 11 वाजल्यापासूनच उपोषणाला ही सुरुवात केली आहे.
या आंदोलनावर प्रतिक्रिया देतांना भुजबळ म्हणाले, ओबीसींवर अन्याय झाला असं लक्षात आलं, तर निश्चितपणे ओबीसींचे देखील आंदोलन सुरू होईल ,त्यामुळे मला असं वाटतं की, सरकार दोन्ही बाजूंचा विचार करून योग्य तो निर्णय घेईल.
Advertisement