शबनम न्यूज | वाशी
वाशीमध्ये मनोज जरांगे पाटील यांची सभा साउंड सिस्टिम पुरेशी नसल्यामुळे थांबविण्यात आले आहे. शासनाच्या प्रतिनिधींबरोबर झालेली चर्चा व शासनाने दिलेली लिखित पत्रावर ते चर्चा करणार आहेत. आरक्षण घेतल्यानंतरच परत जायचं असल्याचा निर्धार पाटील यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या वाशीमधील सभेला विक्रमी गर्दी पहावयास मिळत आहे.
सकाळी 11 वाजता सुरू झालेल्या या सभेत अचानक साऊंड सिस्टम खराब झाल्याने नागरिकांना व्यवस्थित आवाज येत नव्हता, यामुळे सभा थांबविण्यात आली आहे. नवीन साऊंड सिस्टम बसविल्यानंतर सभा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Advertisement
शासनाने लिखित स्वरूपात जे दिले, ते सर्वांना वाचून दाखविले जाईल, आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शासनाचा नवीन आदेश नक्की काय आहे? याविषयी सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.