शबनम न्यूज | मुंबई
मराठा आरक्षणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारच्या शिष्टमंडळासोबत केलेल्या चर्चेनंतर थोड्याच वेळात या चर्चेचा तपशील स्वतः जरांगे पाटील हे समाजासमोर ठेवणार आहेत. तसेच मनोज जरांगे पाटील आंदोलन मागे घेण्याची घोषणा ही करू शकतात. दरम्यान, शिवसेना नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केले आहे.
दीपक केसरकर म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत. शासकीय नियमानुसार त्यावर अंमलबजावणी होईल, महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा आपण 37 लाख कुणबी प्रमाणपत्र दिले, आता आणखी देऊनही संख्या 50 लाखांच्यावर जाणार आहे ,असा दावा दीपक केसरकरांनी केला आहे.
मुंबई ठप्प होणं हे देशाच्या दृष्टीने योग्य नाही, मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतः पुढाकार घेत यंत्रणा कामाला लावली आहे. शेवटी प्रथा ,परंपरेचा मान ठेवनं ही सुद्धा राज्याची संस्कृती राहिली आहे. किती अधिकारी भेटायला गेले, किती नेते भेटायला गेले आणि आता सर्व यंत्रणा कामाला लागले आहेत. मनोज जरांगे यांनी मान ठेवला पाहिजे. त्यांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री भेटून आनंद नक्कीच साजरा करतील, अशी भूमिका देखील केसरकर यांनी घेतली आहे.