शबनम न्युज | पिंपरी
वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत करा, अशी मागणी शहरातील उबाठा गटाचे युवासेना -उपशहरप्रमुख निखिल दळवी यांनी कार्यकारी अभियंता, महावितरण कार्यालय, भोसरी डिव्हिजन यांना निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हंटले आहे कि, आकुर्डी परिसरामधील दत्तवाडी विठ्ठलवाडी विवेक नगर तुळजाईवस्ती एकता नगर क्रांतीनगर टेल्को कपूर कॉलनी आकुर्डी गावठाण पंचतारा नगर गुरुदेव नगर गणेश नगर गंगानगर शुभ श्री सोसायटी परिसर सुभाष पांढरकर नगर ज्ञानेश्वर कॉलनी भंगारवाडी या सर्व परिसरामध्ये वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे त्यामुळे या सर्व परिसरात मधील नागरिक त्रस्त झाले आहे वरील सांगितलेल्या परिसरामध्ये बैठी घरे सोसायटी बंगले असा हा एकंदरीत परिसर आहे या परिसरामध्ये घरातून काम (वर्क फ्रॉम होम) करणाऱ्या लोकांची संख्या बरीच आहे सध्या तारखेला मुलांच्या विद्यार्थ्यांच्या सर्वांच्या परीक्षा सुरू आहेत वीस पुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत कडाक्याची गर्मी पसरली आहे आकुर्डी परिसरामधील वरील सांगितलेले भागांमध्ये वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण जरा जास्तच वाढले आहे रात्री अपरात्री नेहमीच वारंवार लाईट जात आहे
उखाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहे योग्य क्षमतेने वीज पुरवठा होत नसल्यामुळे विजेचा होल्टेज कमी जास्त होत आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांचे टीव्ही फ्रिज यांसारखे अनेक उपकरणे उडून खराब होत आहे याला जबाबदार कोण यामुळे परिसरातील लहान मुले महिलावर्ग ज्येष्ठ नागरिक व सर्वच नागरिक यांच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात नाराजी पसरले आहे त्याचप्रमाणे परिसरातील कोणत्या भागात रस्त्याचे काम सुरू असेल किंवा आणखी काही खोदकाम चालू असेल त्या ठिकाणी खोदकाम करत असताना एखादी अंडरग्राउंड वायर डॅमेज झाली किंवा तुटली तर आपल्या वीज पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून लवकर दखल घेतली जात नाही केबल दुरुस्त करण्यासाठी सहा ते आठ तास वीज पुरवठा खंडित होतो यावरही आपल्या विभागाने लक्ष द्यावे ही देखील खूप गंभीर बाब असून या विषयची दखल घेण्यात यावी आकुर्डी परिसरातील महावितरणाच्या तक्रारी संदर्भात आपल्या विभागाकडून लवकरात लवकर निवारण करण्यात यावे
व वीज पुरवठ्याचा सुरू असलेला लपंडाव लवकरात लवकर थांबवावा ज्याप्रमाणे नागरिक वीज बिलाचा भरणा नियमित करतात त्याचप्रमाणे महावितरण विद्युत विभागाने नागरिकांना वीज पुरवठा ही नियमित पुरवावा आमच्या तक्रारीची गंभीर दखल घ्यावी आकुर्डी मधील वरील सर्व परिसरातील वीजपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करावा यासाठी परिसरातील स्थानिक नागरिकांच्या वतीने लेखी निवेदन देत आहे, असेही सदर निवेदनात नमूद केले आहे.