शबनम न्युज : ०६ फेब. (प्रतिनिधी) पिंपरी चिंचवड :-
पिंपरी चिंचवड शहरातील आकुर्डी विठ्ठलवाडी येथील जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी तळाचे शुशोभीकरण तसेच आकुर्डी गाव ते खंडोबा चौक पालखी मार्गाचे काँक्रिटीकरण करण्याच्या कामाला पिंपरी चिव्हाड महानगर पालिका वतीने उशीर होत आहे तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सन २०१४- १५ च्या अर्थसंकल्पात पालखीतळ सुशोभीकरण करण्यासाठी सुमारे दहा कोटी रुपये निधी मंजूर केला होता परंतु गेला आठ वर्षात पालखीतळाचे सुशोभीकरण करण्यात आले नाही ,यातच महापालिका प्रशासन व सत्ताधारी पक्षाची उदासीनता दिसते अशा आशयाचे निवेदन करीत सदर अपूर्ण काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी शिवसेनेचे युवा नेते निखिल दळवी यांनी महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्याकडे केली.
शिवसेना वतीने सोमवार दिनांक पाच फेब्रुवारी रोजी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत जनता दरबार चे आयोजन केले या जनता दरबारात निखिल दळवी यांनी आपली ही तक्रार अंबादास दानवे यांच्याकडे केली असता ,अंबादास दानवे यांनी त्वरित सदर काम पूर्ण करण्याबाबतची सूचना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला दिली ,अंबादास दानवे यांनी आपल्या सूचनेत नमूद केले की निखिल दळवी यांच्या निवेदनावर नियमानुसार तातडीने कारवाई करण्यात यावी व केलेल्या कारवाईची माहिती सादर करावी.