दिलीप प्रभावळकर करणार इच्छामरण विषयावर भाष्य; लवकरच ‘आता वेळ झाली’ प्रेक्षकांच्या भेटीला
शबनम न्यूज , प्रतिनिधी :
जेष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर त्यांच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्यामनावर राज्य करतात.* ते आत्ताची पिढीपर्यंतचा त्यांचा चाहता वर्ग आहे. असं कोणी क्वचितच असेल ज्यांना दिलीप प्रभावळकर माहिती नसतील. आता त्यांच्या चाहत्यावर्गासाठी एक आनंदाची बातमी समोर येतेय. लवकरच त्याचा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
असे अनेक कलाकार असतात ज्यांच्या सिनेमांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि रोहिणी हट्टंगडी यांचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
अनंत नारायण महादेवन दिग्दर्शित, लिखित ‘आता वेळ झाली’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर झळकले असून पोस्टरमध्ये दिलीप प्रभावळकर आणि रोहिणी हट्टंगडी दिसत आहेत. या चित्रपटाची घोषणा अभिनेते प्रतीक गांधी यांनी आपल्या सोशल मीडियावरुन केली आहे.
सत्य घटनेवर आधारित या चित्रपट नावातच अवर ग्लास दिसतोय आणि त्यातून सरत चाललेली वेळही दिसतेय. ‘इफ यू वाँट अ हॅप्पी एण्डिंग, यू मस्ट नो व्हेअर टू एण्ड युअर स्टोरी’ अशी या चित्रपटाची टॅगलाईन आहे. या ओळीचा या चित्रपटाशी नेमका काय संबंध आहे, याचे उत्तर आपल्याला २३ फेब्रुवारी रोजी चित्रपट आल्यावरच कळणार आहे.