शबनम न्यूज , प्रतीनिधी :
महाराष्ट्र राज्यातील सर्व महानगरपालिकांमध्ये पुन्हा एकदा चार सदस्य प्रभाग पद्धती लागू करण्याचा निर्णय गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला प्रभागाची संख्या वाढविण्याकरिता अध्यादेश काढण्यात येणार आहे मात्र गेल्या चार वर्षापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार या प्रश्नाचे उत्तर अजूनही मिळाले नाही.
महाविकास आघाडी सरकारने महानगरपालिकांमध्ये मुंबई वगळता तीन सदस्य प्रभाग पद्धत लागू केली होती परंतु विद्यमान सरकारने पुन्हा प्रभागाच्या संख्येत बदल केला आहे महानगरपालिकांमध्ये चार सदस्य प्रभाग लागू करण्यात आली असली तरी नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये तीन सदस्य प्रभाग आणि नगराध्यक्षांची थेट निवडणूक कायम राहणार आहे
Advertisement