शबनम न्यूज , प्रतीनिधी :
शिरूर लोकसभा मतदार संघातील शिवसेना पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आंबेगाव येथे पार पडली या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेविषयी बोलताना माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर चर्चा झाली आहे त्यानुसार अजून शिरूरचे जागावाटप झाले नाही चार-पाच दिवसात याबाबतचा निर्णय होईल.
आपण शिरूरची जागा लढवावी अशी शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनतेची इच्छा असून तुम्ही कुठल्याही परिस्थितीत शिरूर लोकसभा लढवा असा एक मुखी आग्रह कार्यकर्त्यांनी केल्यामुळे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसला जर मी उमेदवार मान्य असेल व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्रीन सिग्नल दिला तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवणार आहे असे मोठे विधान शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव पाटील यांनी गुरुवारी केले त्यामुळे आढळराव पाटील मैदानात उतरणारच अशी चर्चा मतदारसंघात जोरदारपणे सुरू आहे.
तसेच मागील पाच वर्षात शिरूर लोकसभा मतदारसंघाचे मोठे नुकसान झाले आहे निवडून आलेल्या खासदाराने जनतेची कामे केली नाही अशी तक्रार शिरूर लोकसभा मतदारसंघातून होत असल्याचे शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
जर शिरूर लोकसभा मतदार संघाची जागा राष्ट्रवादीकडे गेली तर आणि जर राष्ट्रवादीकडून विचारणा झाली किंवा महायुती कडून विचारणा झाली तर याबाबत काय करावे याविषयी मी कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली आहे यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री व तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य राहील पण निवडणूक लढवायची असा आग्रह धरला असल्याचे आढळराव पाटील यांनी सांगितले