शबनम न्युज | ठाणे
मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाकडून राबविण्यात येत असलेला बोरिवली ठाणे हा बहुचर्चित बोगद्याचा प्रकल्प निवडणूक भ्रष्टाचाराचे मोठे उदाहरण असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
ते म्हणाले, बोरिवली ठाणे या प्रकल्पाचे 14,400 कोटी रुपयांचे कत्राट मेघा इंजीनियरिंगला कंपनीला देण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. यात कंपनीने 940 कोटी रुपयांची निवडणूक रोखी खरेदी केल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणजे 14 हजार कोटी रुपयांचे कंत्राटी मिळवा आणि 940 कोटी रुपयांची निवडणूक रोखी विकत घ्या, असा हा कारभार आहे. हा रस्ता म्हणजे पैसे खाण्याची कुरण असून रोख्यांच्या बदल्यात ठेका असा प्रकार असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे.
पुढे ते म्हणाले, मोठे ठेके मिळवायचे असतील तर असे निवडणूक रोखे विकत घ्या, असा हा सरळ साधा मार्ग आहे. हे सरळ गणित केंद्र आणि राज्य सरकारने मांडले आहे. हे स्पष्ट दिसते. या रस्त्याची एका किलोमीटरच्या कामाची किंमत ही यापूर्वी कधीच दिली गेली नसेल, तरी इतकी आहे. जणू काही सोन्याचा मुलामाच या रस्त्याला तुम्ही देताय, असा टोलाही आव्हाडांनी लगावला आहे.