शबनम न्युज | मुंबई
पायाखालची वाळू सरकली की माणूस दहशतवादाचा मार्ग स्वीकारतो. पराभवाची भीती वाटायला लागली लोक आपल्याला स्वीकारणार नाही, याचे भय वाटायला लागले तर तो मोदींचा मार्ग स्वीकारतो. धमक्या द्यायच्या, पोलिसांचा वापर करायचा, आम्हाला धमक्या देतो आणि घेतो ही धमक्याचा प्रकार बारामतीत सुरू आहे. हा डरपोकपणा आहे. धमक्या फोनवर दिला जातात समोरून दिल्या जात नाही, तुमचा अस्तित्व फार थोडा आहे. तुम्ही बारामतीत धमक्या द्याल, पण तुम्हाला मुंबईत यायचं हे लक्षात ठेवा. असा घणाघात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांवर केला आहे.
त्यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, ठाण्याला यायचंय, रस्ता आमचाच आहे. परंतु पवारांना धमक्या देताय की, शिवसैनिकांना धमक्या देताय. कोणाला धमक्या देत आहेत. धमक्या देऊ नका. आम्ही घाबरणारे लोक नाही, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. तसेच ही लढाई बारामतीची नसून महाराष्ट्राची आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेची स्वाभिमानाची लढाई आहे, असे त्यांनी म्हटले आहे.