शबनम न्युज | पुणे
कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन्स ऑफ इंडिया (क्रेडाई),इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल (आयजीबीसी),इंडियन प्लम्बिंग असोसिएशन (आयपीए),फायर अँड सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडिया (एफएसएआय) आणि ‘द इंडियन सोसायटी ऑफ हीटिंग रेफ्रिजरेटिंग अँड एअर कंडिशनिंग इंजिनियर्स ‘(इशरे) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सत्संग सिनर्जी’ या उदघाटन शनिवार,६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी कृषी महाविद्यालय मैदान, शिवाजीनगर येथे झाले. महाराष्ट्र राज्याच्या नगररचना व मूल्यनिर्धारण संचालनालयाचे संचालक अविनाश पाटील,मराठा चेंबरच्या इलेक्ट्रॉनिक क्लस्टर फौंडेशन (एमईसीएफ)चे अध्यक्ष प्रदीप भार्गव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
‘सत्संग सिनर्जी’च्या माध्यमातून पर्यावरण स्नेही,सुरक्षित आणि अधिक कार्यक्षम बांधकामासाठी बांधकाम आणि रिअल इस्टेट क्षेत्रात शाश्वत कार्यपद्धतींना परस्पर सहकार्याने कशी चालना देता येऊ शकते, यावर विचारमंथन करण्यासाठी आणि प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील प्रमुख घटक या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आले.
रणजित नाईकनवरे (क्रेडाई ,पुणे अध्यक्ष), डॉ. पूर्वा केसकर (आयजीबीसी, पुणे अध्यक्ष), नीलेश गांधी (आयपीए, पुणे अध्यक्ष), आशुतोष जोशी (इशरे,पुणे अध्यक्ष), अर्चना गव्हाणे (एफएसएआय, पुणे अध्यक्ष) आदी मान्यवर उपस्थित होते.झायलेम, ओरिएंट फायर कर्टन्स, रेनोटेक एअर इंजिनीअरिंग आणि एमएफएस हे इव्हेंट पार्टनर होते . जे.पी.श्रॉफ यांनी प्रास्ताविक केले.कार्यक्रमाच्या निमंत्रक सुजल शाह यांनी स्वागत केले.अनघा पुरोहित यांनी सूत्र संचालन केले.
कार्यालयांचा सर्वात मोठा समूह असणारा सुरतचा डायमंड बोर्स प्रकल्प,गुंतागुंतीच्या आणि अनोख्या प्रकल्पांवरील केस स्टडी, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि नेट-झिरो उपक्रमांवरील चर्चा आणि ऊर्जा सक्षम प्रकल्प केस स्टडी सह विविध विषयांचा समावेश या कार्यक्रमात होता. याशिवाय हरित(पर्यावरण स्नेही) इमारतींच्या फायद्यांविषयी सादरीकरणही करण्यात आले .या सत्रांमध्ये जे पी श्रॉफ,रणजित नाईकनवरे,सुहास पटवर्धन,डॉ.पूर्वा केसकर, सुजल शाह,जयेश हरीयानी,निलेश गांधी,व्ही.श्रीनिवास,राकेश मोरूडकर,रमण कपूर,रोहित शर्मा ,तेजस चव्हाण,शामकांत मिराशी,रवी कोडील,माधव जोशी,अमित गुलवाडे,अभिषेक अरोरा,प्रणती श्रॉफ,केशव ताम्हणकर, यांनी सहभाग घेतला. प्रदर्शनातील पर्यावरण स्नेही दालनांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
ग्रीन बिल्डिंग साठी हवे कुशल मनुष्य बळ: अविनाश पाटील
ग्रीन बिल्डिंग संकल्पना राबविण्यासाठी अधिकाधिक कुशल मनुष्यबळ उपलब्ध होणे ही आजची गरज आहे, त्यासाठी असे कुशल आणि पर्यावरणाची जाण आणि काळजी असणारे कुशल मनुष्यबळ विकसीत करणे, प्रशिक्षित करणे आवश्यक आहे, असे मत अविनाश पाटील यांनी व्यक्त केले.
ते म्हणाले,’आजच्या या सत्संग सिनर्जी कार्यक्रमातून ग्रीन बिल्डिंग संकल्पनेवर सर्व बांधकाम क्षेत्रातील विविध आघाड्यांवर काम करणाऱ्या संस्थांचे चांगल्या प्रकारे विचार मंथन होऊन, त्यातून चांगला कृतीशील आराखडा तयार झाल्यास बांधकाम क्षेत्राला त्यातून कामाची नवी पर्यावरण पूरक दिशा मिळेल, असेही मत अविनाश पाटील यांनी व्यक्त केले.
निसर्ग जपत बांधकाम करणे गरजेचे: प्रदीप भार्गव
प्रदीप भार्गव म्हणाले,’पुणे शहरात बांधकाम क्षेत्र चहूबाजूंनी खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे, आणि बहुतांशी पर्यावरण पूरक असे बांधकाम अनेक बिल्डर करीत आहेत, तरीसुद्धा आणखी नैसर्गिक साधनसंपत्तीचा विचार होऊन बांधकाम होणे आवश्यक आहे, असे मत भार्गव यांनी व्यक्त केले.’यूज नेचर बट नॉट अॅब्यूज नेचर ‘, या संकल्पनेचा वापर केल्यास, म्हणजेच निसर्गाचा नाश न करता किंवा निसर्गाची हानी न करता निसर्गाचा आपले राहणीमान उंचावण्यासाठी, बांधकाम क्षेत्रात वापर करणे हे बांधकाम क्षेत्रापुढील आवाहन आहे’, असेही, भार्गव यांनी सांगितले.