शबनम न्यूज / पिंपरी
आरटीई अंतर्गत होत असलेल्या ॲडमिशन संदर्भात शाळांचा होत असलेला वाद मिटविण्यासाठी शिवसेनेचे बशीर सुतार यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे लिहिलेल्या पत्रात बशीर सुतार यांनी नमूद केले आहे की सध्या आरटीई च्या अंतर्गत शालेय ॲडमिशनची प्रोसेस सुरू झाली आहे पालकांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता करून सुद्धा शाळा विद्यार्थ्यांना ॲडमिशन देत नाहीत कारण विचारले असता त्यांना सरकारकडून मिळणारी सबसिडीची रक्कम मिळाली नाही त्यामुळे शाळा ॲडमिशन करून घेण्यास नकार देत आहेत रेगुलर ॲडमिशन चे ऑनलाईन क्लासेस सुरू झालेले आहेत आर टी च्या अंतर्गत गरिबांची मुले या अभ्यासक्रमापासून वंचित राहत आहेत त्यांचे प्रचंड नुकसान होत आहेत तरी आरटीई अंतर्गत होत असलेल्या ॲडमिशन संदर्भात शाळांचा असलेला वाद मिटविण्यात यावा शालेय शिक्षण विभागालाही आदेश देण्यात यावे अशी मागणी बशीर सुतार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे