शबनम न्यूज / सोमाटणे
पार्थ पवार फाउंडेशन तळेगाव तर्फे सोमाटणे येथील चौराई नगर येथील सध्या घरीच असणाऱ्या आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या 25 कुटुंबाना अन्नधान्याचे वाटप करण्यात आल्याची माहिती संतोष भेगडे यांनी दिली.
गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाने जगात थैमान घातल्याने अनेक लोकांचे रोजचे काम कमी झाले काहींचे बंदच पडले. त्यामुळे जवळची बचत संपली आणि रोजच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला.ही गोष्ट पार्थ पवार फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांना समजली व आपणही समाजाचं काही देणं लागतो या भावनेतून त्यांनी हे काम हाती घेतले आणी आज मितीला गेल्या दीड वर्षात सुमारे 4 ते साडेचार हजार कुटुंबाना अन्नधान्य वाटप केले.सोमाटणे चौराई नगर या भागात वासुदेव समाजाचे काही लोक आहेत आणि सध्या त्यांचे गावोगाव फिरणे बंद असल्याने त्यांची रोजच्या जेवणाची सुद्धा मारामार होत आहे असे समजले .तळेगाव नगरपालिका सदस्य संतोष भेगडे यांनी या सर्व कुटुंबाना गहु, तांदूळ, साखर,तेल, डाळ, मीठ, चहा पावडर, हळद, साबण,मसाला,भाजी,रक्तवाढीच्या गोळ्या, सॅनिटायझर,मास्क असे एक महिनाभर पुरेल एव्हडे किराणा आणि आरोग्यासाठी आवश्यक असणारे साहित्य पोहोच केले. त्यांना हे साहित्य पोहोच करताना या लोकांच्या चेहऱ्यावर काही काळ का होईना समाधान निर्माण करू शकलो याचा आनंद आहे असे यावेळी बोलताना भेगडे यांनी सांगितले. आणि भविष्यातही असेच सामाजिक उपक्रम राबवणार असल्याचेही संतोष भेगडे यांनी सांगितले.