- पं. मोदींच्या कल्याणकारी योजनांमुळेच देशाची ‘नव भारता’कडे वाटचाल – विक्रांत पाटील
- निगडी-प्राधिकरणात ‘नव भारत’ मेळावा उत्साहात संपन्न
शबनम न्यूज | पिंपरी
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या सात वर्षात केलेल्या कामाचे प्रदर्शन व मोदी सरकारने युवकांसाठी सुरू केलेल्या योजनांची माहिती मिळावी; यासाठी भाजयुमोच्या वतीने पंतप्रधानांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त ‘नव भारत’ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. हा मेळावा भाजयुमो उपाध्यक्ष अनुप मोरे यांच्या निगडी प्राधिकरणातील जनसंपर्क कार्यालयात नुकताच उत्साहात पार पडला.
भाजयुमोतर्फे सेवा आणि समर्पण अभियान अंतर्गत ‘नव भारत’ संकल्पनेकडे अनेक युवकांचे लक्ष वेधून घेतले. दरम्यान कार्यक्रमात नमो ॲपबद्दल उपस्थितांना माहिती देण्यात आली. केंद्र सरकारच्या विविध योजनांचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी स्थानिक हस्तकला, बचत गटांचे स्टॉल, खाद्य पदार्थांच्या स्टॉलचे प्रदर्शनही भरविण्यात आले होते.
मेळाव्यास भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अभिनव प्रकाश, राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य अरविंद दमानी, भाजयुमो प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष अनुप मोरे, आमदार तथा शहराध्यक्ष महेश लांडगे, प्रदेश सचिव अमितजी गोरखे, प्राधिकरण अध्यक्ष सदाशिव खाडे ,मा उपमहापौर विद्यमान नगरसेविका सौ शैलजा ताई मोरे , प्रदेश सरचिटणीस सुशील मेंगडे, भाजयुमो कार्यकारिणी सदस्य गणेश कुटे, सुशांत गाडे, अजित कुलथे, अक्षय नलावडे, अमृत मारणे, सचिन जायभाये, गणेश वर्पे, प्रदेश सचिव सुजित थिटे, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख तुषार हिंगे, शहर भाजयुमो अध्यक्ष संकेत चोंधे, सरचिटणीस दिनेश यादव गणेश जवळकर उपाध्यक्ष प्रसाद कस्पटे,तेजस खेडेकर, शिवराज लांडगे, संदीप नखाते, चिटणीस प्रकाश चौधरी सह संयोजिका सोशल मीडिया प्रियांका शाह, प्रियांका देशमुख. विद्यार्थी आघाडी संयोजक दिगंबर गुजर, अजय मोरे, सुहास आढाव अनुसूचित आघाडी संयोजक सचिन उदागेआदी उपस्थित होते.
राष्ट्रीय उपाध्यक्ष अभिनव प्रकशजी म्हणाले, वैश्विक नेतृत्व, असामान्य व्यक्तिमत्व आणि जगातील सर्वात सामर्थ्यशाली नेते पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांचे ‘नव भारत’ निर्मितीत मोठे योगदान आहे. मे २०१४ मध्ये कार्यभार स्वीकारल्यापासून पंतप्रधान मोदी यांनी सर्वंकष आणि सर्वसमावेशक विकासाच्या मार्गावर वाटचाल सुरू केली. अंत्योदय अर्थात शेवटच्या व्यक्तीपर्यंत सेवा पोहोचवून त्याचा विकास करण्याच्या तत्त्वाने ‘नव भारत’ अभियान सर्वाधिक प्रेरित होत आहे. लोकांशी थेट संपर्काबरोबरच ऑनलाईन संवादामुळे भारताचे सर्वाधिक टेक्नो-सॅव्ही नेते म्हणूनही त्यांची ओळख आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अभिनव कल्पना आणि उपक्रमांच्या माध्यमातून प्रगतीची चाके जलद गतीने फिरतील आणि विकासाची फळे प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचतील, याची सरकारने खबरदारी घेतली आहे. त्यामुळेच मोदी सरकार आता अधिक खुले, सुलभ आणि पारदर्शक बनले आहे.
प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या आर्थिक व्यवस्थेमध्ये प्रत्येक नागरिक सहभागी व्हावा; यासाठी प्रधानमंत्री जन धन योजना आमलात आणली. व्यापार सुलभ बनवण्यावर भर देण्याबरोबरच त्यांच्या ‘मेक इन इंडिया’ या आवाहनामुळे गुंतवणूकदार आणि उद्योजकांमध्ये अभूतपूर्व उत्साह संचारला. श्रम सुधारणा आणि ‘श्रमेव जयते’ उपक्रमाअंतर्गत श्रम प्रतिष्ठेमुळे लघु आणि मध्यम उद्योगांमधील अनेक कामगारांचे सशक्तीकरण झाले तसेच आपल्या कुशल युवकांना देखील प्रोत्साहन मिळाले. मोदी सरकारने जनतेसाठी तीन सामाजिक सुरक्षा योजना सुरू केल्या आणि त्याचबरोबर ज्येष्ठांना निवृत्तीवेतन आणि गरीबांना विम्याचे कवच देण्यावर भर दिला. जुलै २०१५ रोजी पंतप्रधानांनी ‘डिजिटल इंडिया’ अभियानाचा शुभारंभ केला. जनतेच्या जीवनमानात गुणात्मक बदल करण्यासाठी तंत्रज्ञानाचा कल्पक आणि अधिकाधिक वापर करणाऱ्या अशा योजनांमुळेच आपला भारत देश खरोखरच ‘नव भारत’ म्हणून ओळखला जात आहे.