शबनम न्यूज | बोपोडी (दि.०७ डिसेंबर) :- भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बोपोडी परिसरात शांती यात्राचे आयोजन करण्यात आले होते.
शांती यात्राचे आयोजन गोदाई सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विनोद दादासाहेब रणपिसे यांनी केले असून यास भिमज्योत तरूण मंडळ, भिमज्योत महिला मंडळ, भिमज्योत स्पोर्टस् क्लब, रमाईमाता मंडळ, औधरोड यांचे सहयोग लाभले.
शांती यात्राला संभोधित करताना विनोद दादासाहेब रणपिसे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संपुर्ण भारताला बौध्द धम्माची शिकवण दिली आहे. बौध्द धम्म हा शांती मार्गाने जाणारा आहे. तरुण वर्गा सोबत सर्व स्तरातील नागरिकांनी शांतीचा मार्ग अवलंब करने गरजेचे आहे. हा संदेश सर्वत्र पोहचावा याच उद्देशाने आज शांती यात्राचे आयोजन करण्यात आले.
बोपोडी येथीली सर्व्हे नंबर 26 येथून शांती यात्रेची सुरुवात करण्यात आली. ही शांती यात्रा सर्व्हे नंबर 24,25 येथून बोपोडी गावठाण, महादेव मंदीर आदी परिसरातून काढत भाऊ पाटील रोड मार्गे या यात्रेचा समारोप बोपोडी औध रोड येथील आंबेडकर चौकात करण्यात आला. या यात्रेस भरपुर नागरिकांनी सहभाग घेतला होता आणि सर्वांनी आपल्या हातात ज्योत पेटवून घेतली होती. शेवटी सर्वांनी आपली ज्योत आंबेडकर चौकात लावण्यात आल्या.