शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१२ एप्रिल) :- पिंपरी-चिंचवड शहरामध्ये गुन्हेगारीच्या घटनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. यावर उपाय योजना करून पिंपरी- चिंचवड शहरातील वाढती गुन्हेगारी थांबवावी व रात्रीच्या दरम्यान पेट्रोलिंग वाढवावे अशी मागणी सुरज गजानन बाबर, अध्यक्षः कृषी,पर्यावरण, शिक्षण आणि नागरी समस्या निवारण संघटना यांनी गृहमंत्री महाराष्ट्र राज्य व कृष्ण प्रकाश,पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे कि, पिंपरी-चिंचवड शहरामध्ये नुकत्याच काळेवाडी फाट्यावर तसेच आकुर्डी मध्ये आय.टी क्षेत्रात व रात्रपाळीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कोयत्याद्वारे तसेच धारदार शास्त्राद्वारे हल्ला करून लुटमार प्रकरणे झाली आहेत,आयटी सेक्टर हे पिंपरी-चिंचवड शहरालगत असून नाईट शिफ्टला असणारे कर्मचारीवर्ग यांना रात्री प्रवास करावा लागतो तसेच वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. यामुळे वरील प्रकार पुन्हा होऊ नयेत यावर उपाय योजना आपण कराव्यात तसेच रात्रीचे पेट्रोलिंग वाढवावे जेणेकरून सर्वसामान्य नागरिक तसेच कर्मचारीवर्ग सुरक्षित राहील. तसेच अज्ञात इसमानकडून अशाप्रकारे घटना घडण्याचे प्रकार कशाप्रकारे थांबवले जातील व यापुढे पिंपरी-चिंचवड शहरातील प्रत्येक नागरिकाला आपण सुरक्षित आहोत अशी भावना निर्माण होईल यासाठी पोलिसांमार्फत योग्य ती कार्यवाही करावी, पिंपरी चिंचवड शहरातील गुन्हेगारी थांबवण्यासाठी योग्य ती कठोर पावले उचलावीत व अशा प्रकारच्या गुन्हेगारी रोखण्यासाठी कठोर कारवाई करावी जेणेकरून सर्वसामान्य नागरिक सुरक्षित राहील.