शबनम न्युज | मुंबई
बीडच्या गेवराई येथे दोन कारखान्यांकडून ऊस तोडून नेला जात नसल्याने निराश झालेल्या एका उत्पादक शेतकऱ्याने दोन एकर उसाला काडी लावून त्याच शेतातील झाडाला दोरीने गळफास घेऊन मरण कवटाळले. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत म्हंटले आहे कि, ऊस उत्पादक शेतकऱ्यांनो घाबरू नका, ऊस गाळप संपवायचे काम युद्धपातळीवर सुरू आहे, कोणताही टोकाचा निर्णय घेऊ नका. सरकार तुमच्या पाठीशी आहे, असं आवाहन अजित पवार यांनी केले. जनता दरबार उपक्रमास अजित पवार आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
अजित पवार म्हणाले की, ऊसाचे काय होणार याची चिंता शेतकऱ्यांना आहे. सध्या गळीत हंगाम वाढला आहे. मे महिन्यात रिकव्हरी लॉस आहे. यावर साखर आयुक्त व सहकारमंत्री आढावा घेत आहेत. बीड जिल्हयात दु:खद घटना घडली आहे. आमच्या एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. परंतु शेतकऱ्यांनी धीर सोडू नये. आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नये, असं आवाहन अजित पवार यांनी केले.