शबनम न्युज | पिंपरी
प्रभाग क्रमांक १४ मधील पाणी पुरवठा सुरळीत करा, अशी मागणी निखिल दळवी (संस्थापक/ अध्यक्ष – विठ्ठल प्रतिष्ठान) यांनी कार्यकारी अभिंयता, पाणी पुरवठा विभाग अ क्षेत्रिय कार्यालय निगड़ी यांनी निवेनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, प्रभाग क्रमांक १४ मधील विठ्ठलवाडी दत्तवाडी विवेकनगर श्रीकृष्ण क्रांती नगर टेल्को कपूर कॉलनी मारुती कॉम्प्लेक्स रुपाली लाँड्री जवळील मोरे वाडा परिसर इत्यादी परिसरात पाणी पुरवठा वेळी अ वेळ होत आहे या सर्व परिसरात होणाऱ्या पाणी पुरवठ्याला प्रेशर यात नाही हळू हळू पाणी पुरवठा होत आहे त्या मुळे या सर्व परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत नळाच्या पाण्याला प्रेशर यात नाही आशा स्थानिक नागरिकांच्या कायमच तक्रार आहेत एक तर मनपा च्या वतीने नागरिकांना रोज पाणी पुरवठा केला जात नाही प्रत्येक एक परिसराला एका दिवसा आड़ पाणी पुरवठा केला जात आहे त्यात एखाद्या दिवशी पाणी पुरवठा झाला नाही तर नागरिकांनाचा पाण्याचा प्रशन निर्माण होतो एखाद्या परिसरात पाणी काही कारणास्तो पाणी पुरवठा झाला नाही तर नागरिकांनी पाणी कोनकडे मागायचे कोणत्याही परिसरात पाणी पुरवठा झाला नाही तर मनपा च्या वतीने त्या परिसरात टाँकर द्वारे पाणी पुरवठा केला गेला पाहिजे एखादा दिवस कोणत्याही परिसराला किवा भागाला पाणी पुरवठा झाला नाही तर त्या परिसरातील नागरिकांचे जनजीवन विसकळीत होते कारण जीवन जगण्यासाठी पाण्याची आवक्षकता महत्वाची आहे तरी या सर्व बाबांनी चा विचार करता या सर्व परिसरातील पाणी पुरवठा सुरळीत करावा, असे सदर निवेदनात त्यांनी नमुद केले आहे.