शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळले. पण हे सरकार कोसळण्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद व उस्मानाबाद या शहरांची नावे बदलली. औरंगाबादचे नाव संभाजीनगर व उस्मानाबाद चे नाव धाराशिव केले. हे करत असताना सत्तेत असलेले काँग्रेस पक्षाच्या वतीने कोणताही विरोध करण्यात आला नाही कि, महाराष्ट्र राज्यातील काँग्रेसने कोणत्याही प्रकारचे निषेध आंदोलन केले नाही. या सर्व प्रकाराचा संताप व्यक्त करीत पिंपरी चिंचवड शहराचे काँग्रेसचे अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष शाबुद्दीन शेख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राहुल गांधी तसेच नाना पाटोळे यांना आपला राजीनामा पाठवीत असताना या राजीनामे मध्ये नमूद केले आहे कि, राज्यात महाविकास आघाडीचे शासनाकडून २९ जून २०२२ रोजी अचानकपणे मंत्रिमंडळाचे कॅबिनेट बैठकीमध्ये औरंगाबाद शहराचा नामांतर संभाजीनगर व उस्मानाबाद शहराचा नामांतर धाराशिव म्हणून करण्यात आले. त्यावर काँग्रेस पक्षाने व समविचारी राष्ट्रवादी काँग्रेसने कोणतेही विरोध दर्शविला नाही. (कॉमन मिनिम्म प्रोग्राम) ठरवून राज्यात महाविकास आघाडीचे शासन अस्तित्वात आले होते. परंतु घटक पक्षांच्या बंडखोरीमुळे सदर सरकार पूर्ण पाच वर्ष टिकला नाही. याचा आम्हास खेड आहे. परंतु मुस्लिम अल्पसंख्यांक समाज सदर शासनामध्ये आरक्षण मिळेल, या उद्देशाने होता परंतु कोणतेही आरक्षण मुस्लिम समाजाला मिळाला नाही.
ऐतिहासिक शहराच्या नामांतरांचे प्रस्ताव मंजूर करताना काँग्रेस पक्षाने मूकपणे सहमती दर्शविली. कोणीही त्यास विरोध केला नाही. वास्तविक पाहता माझं या निर्णयाला स्पष्ट विरोध आहे. त्यामुळे मी काँग्रेस पक्षाच्या सदस्यांची व अल्पसंख्यांक शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. असेही सदर निवेदनात शाबुद्दीन शेख यांनी नमूद केले आहे.