भाजपाचाही वर्चस्वाचा दावा
पुणे : (शबनम न्यूज प्रतिनिधी)
पुणे जिल्ह्यातील २२१ ग्रामपंचायतच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने १३१ ठिकाणी आपले वर्चस्व प्रस्थापित झाल्याचा दावा केला आहे तसेच भाजपनेही ६९ ठिकाणी आपला झेंडा फडकवल्याचे छातीठोकपणे सांगितले तर काँग्रेसने २६ ठिकाणी यश मिळविले आहे. जिल्ह्यातील २२१ ग्रामपंचायतच्या मतमोजणीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला या निवडणुका अधिकृत रीत्या कोणत्याही पक्ष चिन्हावर लढवल्या गेल्या नाहीत तरी सर्वच पक्षांनी आपलेच वर्चस्व प्रस्थापित असल्याचा दावा केला आहे . जिल्ह्यात २२१ पैकी ४९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. मतमोजणीत भोर आणि आंबेगाव तालुक्यात दोन प्रतिस्पर्धी उमेदवारांना समान मते मिळाली त्यामुळे नियमानुसार चिठ्ठी टाकून विजयी उमेदवार घोषित केल्याचे सूत्रांनी सांगितले.
जिल्हा प्रशासनाकडून गुरुवारी विजयी झालेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे जिल्ह्यात भोर वगळता अन्य तालुक्यांमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे या निवडणुकांमध्ये काही ठिकाणी राष्ट्रवादीने काँग्रेस सोबत निवडणूक लढविल्या आहेत, शिवसेना आणि शिंदे गट हे समोरासमोर उभे ठाकले होते दोन वर्षाच्या खंडानंतर यंदा पुन्हा जनतेतून थेट सरपंच निवडून आणण्याची पद्धत अमलात आल्याने ही निवडणूक चुरशीची ठरल्याचे निरीक्षण जाणकारांनी नोंदविले जिल्ह्यातील 131 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच पदाचे उमेदवार निवडून आले असून त्या ठिकाणी ग्रामपंचायती ताब्यात आल्या आहेत त्यामुळे राष्ट्रवादीने जिल्ह्यात पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध झाल्याचं दावा केला आहे.
दुसरीकडे भाजपने १२३ सरपंच पदाच्या जागा लढविल्या असून दुसऱ्या क्रमांकावर बाजी मारली आहे पहिल्याच प्रयत्नात ग्रामपंचायत निवडणुकीत मुसंडी मारण्यात यश आल्याचा दावा भाजपने केला आहे काँग्रेसने २६ ठिकाणी ग्रामपंचायत तब्यत ठेवल्या काही ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादी किंवा अन्य पक्षाच्या पाठिंबावर ग्रामपंचायतीत समिश्र सत्ता आली आहे.