शबनम न्युज | पुणे (वृत्तसंस्था)
लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून सर्वच पक्षांकडून जागा वाटप आणि उमेदवारी निश्चित करण्यावर भर देण्यात येत आहे. यामुळे उमेदवारी आणि जागा वाटपावरून अनेक दावे-प्रतिदावे, आरोप-प्रत्यारोप केले जात असून वसंत मोरे मात्र कोणत्या पक्षातून आणि कोणत्या चिन्हातून लोकसभा निवडणूक लढवतील, असे प्रश्न सर्वांना पडत आहेत. दरम्यान, वसंत मोरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ‘मी योग्य योग्य वेळी योग्य निर्णय घेईल’, असे वसंत मोरे यांनी स्पष्ट सांगितले आहे.
ते म्हणाले, आजपासून निवडणुकीला 55 दिवस आहेत. त्यामुळे कमी दिवस वगैरे काही नाही. ज्यादिवशी वसंत मोरे रिंगणात उतरेल त्या दिवशी पुणे लोकसभेच्या निवडणुकीत खऱ्या अर्थाने रंगत होईल, तेव्हा आपण निवडणूक कसे एकतर्फी होईल, हे पाहू माझी वेळ नक्कीच चुकलेली नाही. मी वेळ घेतोय, योग्य वेळी मी योग्य निर्णय घेईल, असं स्पष्टीकरण वसंत मोरे यांनी दिले आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. इथे फक्त निवडणुका लढायचे नाही तर जिंकायच्या ही आहेत. त्यामुळे जिंकण्यासाठी लढायचे असेल तर योग्य ट्रॅकवर असणे गरजेचे आहे. मी योग्य ट्रॅकवरच असून त्यात यशस्वी होईल, असे मला वाटते. पुढील राजकीय वाटचाली संदर्भात आम्ही लोकांकडून मत जाणून घेत आहोत. लोक काही पर्याय सुचवतात पण ते निवडताना पुण्याचे हित झाले पाहिजे, त्या दृष्टीने पावले टाकतो, असे मोरे म्हणाले.