शबनम न्युज / पुणे
राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतक-यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतक-यांना, मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती , मनोबल यांमध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतक-यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतक-यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन कृषि विभागामार्फत राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविली जात आहे. सन २०२० च्या रब्बी हंगामासाठी सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी रब्बी ज्वारी, गहू, हरभरा, जवस, तीळ व करडई या 6 पिकांसाठी पीकस्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. तथापी जवस व तीळ या 2 पिकांसाठी स्पर्धक संख्या कमी असल्याने स्पर्धा झाल्या नाहीत. उर्वरीत रब्बी ज्वारी, गहू, हरभरा व करडई या चार पिकांसाठी राज्यामधुन एकुण 6053 स्पर्धक शेतक-यांनी सहभाग घेतला. त्यानुषंगाने सन २०२० च्या रब्बी हंगामाचा सर्वसाधारण व आदिवासी गटासाठीचा निकाल दि.२४/०६/२०२१ रोजी राज्यस्तरीय पिकस्पर्धा समितीमार्फत निकाल घोषित करण्यात आला.
रब्बी ज्वारी या पिकातील सर्वसाधारण गटाच्या प्रवर्गामध्ये श्री.साहेबराव मन्याबा चिकणे मु.पो. सोनगांव, ता.जावली, जि.सातारा यांनी १०१ क्विं/हे उत्पादन घेऊन प्रथम क्रमांक, श्री.सोमनाथ बाबुराव मुंडेकर, मु.पो.आरसोली, ता.भुम, जि.उस्मानाबाद यांनी ९४.३० क्विं/हे उत्पादन घेऊन द्वितीय क्रमांक तर श्री.नितीन बाजीराव वरखडे, मु.पो.वरखडवाडी, ता.वाई, जि.सातारा यांनी ९० क्विं/हे उत्पादन घेऊन तृतीय क्रमांक मिळविला आहे. तसेच रब्बी ज्वारी या पिकातील आदिवासी गटाच्या प्रवर्गामध्ये श्री.आटया देवजी पाडवी.
पो.खेडले,ता.तळोदा,जि.नंदुरबार यांनी ५१.५० क्विं/हे उत्पादन घेऊन प्रथम क्रमांक, श्री.नोवा आटया पाडवी, मु.पो.नर्मदानगर ता.तळोदा, जि.नंदुरबार यांनी ४३ क्विं/हे उत्पादन घेऊन द्वितीय क्रमांक तर श्री.बापू नागो पवार, मु.पो.कळंबू ता.शहादा, जि.नंदुरबार यांनी ३६.४० क्विं/हे उत्पादन घेऊन तृतीय क्रमांक मिळविला आहे. गहू या पिकातील सर्वसाधारण गटाच्या प्रवर्गामध्ये श्री.सुहास वसंतराव बर्वे,मु.पो.डुबेरे,ता.सिन्नर, जि.नाशिक यांनी ९०.७१ क्विं/हे उत्पादन घेऊन प्रथम क्रमांक, श्री.आप्पासाहेब नामदेव आरोटे, मु.पो.महाजनपूर ता.सिन्नर, जि.नाशिक यांनी ९० क्विं/हे उत्पादन घेऊन द्वितीय क्रमांक तर श्री.शिवाजी बाजीराव सोमवंशी
मु.पो.सुंदरपूर,ता.निफाड, जि.नाशिक यांनी ८२.९८ क्विं/हे उत्पादन घेऊन तृतीय क्रमांक मिळविला आहे. तसेच गहू या पिकातील आदिवासी गटाच्या प्रवर्गामध्ये श्री.विठ्ठल भिवा आवारी मु.पो.साकुर, ता.ईगतपुरी यांनी ६०.१० क्विं/हे उत्पादन घेऊन प्रथम क्रमांक, सुधाकर बापूराव कुंभेरे मु.पो.लोणसावळी, ता.वर्धा,जि वर्धा यांनी ५४ क्विं/हे उत्पादन घेऊन द्वितीय क्रमांक तर महेंद्र दौलत नैताम,मु.पो.खैरगाव दे.ता.पांढरकवडा, जि.यवतमाळ यांनी ५३.६८ क्विं/हे उत्पादन घेऊन तृतीय क्रमांक मिळविला आहे.
हरभरा या पिकातील सर्वसाधारण गटाच्या प्रवर्गामध्ये श्री.वसंत पांडुरंग कचरे मु.पो.काटेवाडी, ता.खटाव,जि.सातारा यांनी ६३.१० क्विं/हे उत्पादन घेऊन प्रथम क्रमांक, श्री.सुरेश देवबा चेके मु.पो.पिंपरी (मे) ता.वर्धा, जि.वर्धा यांनी ५५ क्विं/हे उत्पादन घेऊन द्वितीय क्रमांक तर श्रीमती सुमन शिवाजी जगताप, मु.पो.सुरवड ता.इंदापूर, जि.पुणे यांनी ५४.३२ क्विं/हे उत्पादन घेऊन तृतीय क्रमांक मिळविला आहे. तसेच हरभरा या पिकातील आदिवासी गटाच्या प्रवर्गामध्ये श्री.हिराचंद मोतीराम गावीत, मु.पो.धनेर दि.,ता.कळवण,जि.नाशिक यांनी ४८.३० क्विं/हे उत्पादन घेऊन प्रथम क्रमांक, श्री.कैलास राजाराम पवार मु.पो.ईनशी, ता.कळवण, जि.नाशिक यांनी ४२.२६ क्विं/हे उत्पादन घेऊन द्वितीय क्रमांक तर श्री.देवराव कोन्दुजी शेडमाके मु.पो.डोंगरगांव मक्ता, ता.गोडपिंपरी, जि.चंद्रपूर यांनी ४१.३१ क्विं/हे उत्पादन घेऊन तृतीय क्रमांक मिळविला आहे.
करडई या पिकातील सर्वसाधारण गटाच्या प्रवर्गामध्ये श्री.राजेश हनमंतराव हाळदे मु.पो.आतूर, ता.देगलूर, जि.नांदेड यांनी ३४.७२ क्विं/हे उत्पादन घेऊन प्रथम क्रमांक, श्री.सुनिल नामदेव चिमनपाडे मु.पो.कुडली ता.देगलूर, जि.नांदेड यांनी २७.७९ क्विं/हे उत्पादन घेऊन द्वितीय क्रमांक तर श्री.प्रतापरेडडी देवन्ना चिंतलवार मु.पो.आलूर, ता.देगलूर, जि.नांदेडयांनी २३.५६ क्विं/हे उत्पादन घेऊन तृतीय क्रमांक मिळविला आहे. करडई पिकामध्ये आदिवासी प्रवर्गातून स्पर्धक सहभागी झाले नाहीत. या सर्व पिकस्पर्धा विजेते शेतक-यांना राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत प्रथम क्रमांकाला रक्कम रु.५०,०००/-, द्वितीय क्रमांकाला रक्कम रु.४०,०००/- आणि तृतीय क्रमांकाला रक्कम रु.३०,०००/- बक्षीस रक्कम मिळणार आहे.