शबनम न्यूज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात निर्माण झालेल्या पुरस्थितीमुळे मोठे संकट नागरिकांवर कोसळले आहे. तेथील नागरिकांचे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा नागरिकांसाठी शिवसेना कामगार नेते इरफानभाई सय्यद व महाराष्ट्र मजदूर संघटना यांनी पूरग्रस्त नागरिकांच्या सेवार्थ खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला आहे.
यामध्ये प्रामुख्याने पिण्याचे पाणी, चादर, चटई व मेणबत्ती , इतर खाद्यपदार्थ असे जीवनावश्यक साहित्य पिंपरी-चिंचवड शहरातून रायगड जिल्ह्याकडे शिवसेना कामगार नेते इरफानभाई सय्यद व महाराष्ट्र मजदूर संघटना यांच्या वतीने रवाना करण्यात आले.
संपूर्ण महाराष्ट्र कोकणवासीयांच्या मदतीला धावून आला आहे. अशा संकटकाळात सामाजिक बांधिलकी जपत शक्य ती मदत करणे हीच खरी माणुसकी आहे. असे मत यावेळी शिवसेना कामगार नेते इरफानभाई सय्यद यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.