शबनम न्युज | कोल्हापूर
कोल्हापूर | प्रतिनिधी
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी काल (दि.30 ) कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी येथील पूर बाधित भागाची पाहणी केली. त्यानंतर शिवाजी पूल आणि पंचगंगा हॉस्पिटल येथेही त्यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधला.
तसेच, त्यांनी शिरोळ येथील पद्माराजे विद्यालय पूरग्रस्त निवारा केंद्रात असलेल्या पूरग्रस्तांशी संवाद साधला.
हि बातमी पण वाचा -Mumbai : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांना श्रद्धांजली
कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मांडलेले मुद्दे :
अतिवृष्टीचा इशारा मिळाल्यावर स्थानिक प्रशासनाने काही लाख नागरिकांचे स्थलांतर करून जीव वाचवले. पशुधनही त्याचप्रकारे वाचवण्यात आलं.
महाराष्ट्रावर कोसळलेले हे अस्मानी संकट भयानक आहे. या संकटातून बाहेर पडताना कोविड तसेच पुराच्या पाण्यामुळे होऊ शकणारी रोगराई रोखण्यासाठी साफसफाई करणं, नागरिकांना दिलासा देणं, त्यांचं पुनर्वसन करणं यास आमचं प्राधान्य आहे.
हे संकट नेहमीचंच झालं आहे आणि त्यात आमचे संसार वाहून जात आहेत, तेव्हा त्यावर कायमस्वरुपी तोडगा काढावा अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
नद्या फुगल्यामुळे येणाऱ्या अतिरिक्त पाण्याच्या नियोजनाचा आराखडा करून काम सुरू केलं जाणार आहे. कोसळणाऱ्या दरडी, खचणारे रस्ते लक्षात घेता भूगर्भाचा अभ्यास करून त्याबाबतीत काही उपाययोजना केली जाणार आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे पूरबाधित क्षेत्रातील तसेच दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या वस्त्यांचेही चांगल्या पद्धतीने पुनर्वसन करण्यावर आमचा भर आहे. हे साध्य करण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील. नदीपात्रातली अतीक्रमणे, बांधकामांना परवानगी न देण्याच्या सूचना मी दिल्या आहेत.
या पुराचं भीषण वास्तव जवळून पाहिल्यानंतर त्यासंदर्भातील कामाला, आराखड्याला गती दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.