शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील व्यापारी , हॉटेल व्यवसायिक, किरकोळ विक्रेते, यांना व्यवसाय करण्यासाठी वेळ वाढवून देण्यात यावी, असे मागणीचे निवेदन माजी खासदार गजानन बाबर यांनी माननीय जिल्हाधिकारी, पुणे यांना दिले आहे.
हि बातमी पण वाचा -Pimpri Chinchwad : भक्ती शक्ती उड्डाणंपुलावरील अपघात लक्षात घेता महापौर माई ढोरे यांनी केली पाहणी
दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हंटले आहे कि, पिंपरी-चिंचवड शहराची ओळख उद्योगनगरी म्हणून आहे ,येथे सर्व स्तरातील लोक वास्तव्यास आहेत कोरोना महामारी मुळे सर्वसामान्य व्यापारी असतील, हॉटेल व्यवसायिक असतील ,किरकोळ विक्रेते असतील सर्वांचे अक्षरशः आर्थिक नुकसान झाले असून ते भरून न येण्यासारखे आहे. आज आपण जर पाहिले तर 70 टक्के यातील व्यवसायिक यांची रोजीरोटी दररोज होणाऱ्या व्यवसायावर अवलंबून असते व सकाळ पासून जर काम केले तर संध्याकाळी त्यांना जेवायला मिळते आज आपण जर पाहिले तर व्यापाऱ्यांना सुद्धा या कोरोना महामारीचा फटका बसल्याकारणाने त्याचा परिणाम नागरिकांवर ही पडत आहे, व्यापारामुळे नागरिकांचीही गैरसोय होत आहे. यातच काही व्यवसायिकांनी कर्ज काढून आपले व्यवसाय उभे करण्यास सुरुवात केली परंतु त्यांची अक्षरशा दयनीय अवस्था झाली आहे.
माननीय महोदय , आज आपण जर पाहिले तर संपूर्ण व्यवसाय ठप्प झाले असून व्यवसाय व व्यवसायावर अवलंबून असणारे नागरिक यांनाही त्याचा भार सोसावा लागत आहे. आज आपण जर पाहिले तर सर्वसामान्य घाऊक व्यापारी तसेच फुटपाथवर काम करणारे व्यवसायिक यांचेही लाॅकडाऊन मुळे अत्यंत नुकसान होत होऊन त्यांना आपली उपजीविका कशी चालवली असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे, व शासनाच्या ब्रेक द चैन या रुल मुळे, व्यापारांना व्यवसाय करण्याच्या वेळे मध्ये सुद्धा बंधने येत आहेत , आज आपण पाहिले तर कोरोना रुग्ण पिंपरी-चिंचवड शहरात कमी झाले असून पिंपरी-चिंचवड शहरातील व्यापाऱ्यांना वेळेमध्ये सवलत मिळण्याची नितांत आवश्यकता आहे . पिंपरी-चिंचवड शहरातील व्यापारी असतील, हॉटेल व्यवसायिक असतील, टपरीवाले, फुटपाथवर काम करणारे व्यवसायिक यांना आपण वेळेमध्ये सूट देऊन सकाळी 11 वाजल्यापासून ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत मुभा देण्यात यावी. ही मी पिंपरी शहरातील तमाम व्यापारी, हॉटेल व्यावसायिक, किरकोळ विक्रेते ,घाऊक विक्रेते यांच्या तर्फे यांच्या संघटनेतर्फे आपणास नम्र विनंती करीत आहे तरी आपण यावर त्वरित निर्णय घेऊन नागरिकांची व्यापार्यांची होणारी गैरसोय टाळावी, असे हि दिलेल्या निवेदनात माजी खासदार गजानन बाबर यांनी म्हंटले आहे.