शबनम न्युज | मुंबई
मुंबई | प्रतिनिधी
संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी पुकारण्यात आलेल्या भारत बंदला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाठिंबा दर्शवला आहे. या भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी मुंबई येथे पक्षाचे मुंबई विभागीय अध्यक्ष आणि राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी आंदोलन पुकारले. तसेच राज्यभर पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून निदर्शने करण्यात येत असल्याचे नवाब मलिक यांनी माध्यमांना सांगितले.
Advertisement
कित्येक महिन्यांपासून हे आंदोलन सुरु असताना केंद्र सरकारच्या अहंकारी भूमिकेमुळे कोणतीही तडजोड झालेली नाही. लोकशाहीमध्ये कायदे रद्द करता येतात तसेच नवे कायदे तयार करता येतात. त्यामुळे केंद्र सरकारने तयार केलेले तीनही कृषी कायदे रद्द करावेत, ही आमच्या पक्षाची भूमिका आहे, असे नवाब मलिक म्हणाले.
Advertisement