शबनम न्युज | अहमदनगर
आबासाहेब शिरसाठ | प्रतिनिधी
खड्डेच खड्डे चोहीकडे…अन गेला रस्ता कुणीकडे…अशी दयनीय अवस्था झालेल्या नेवासा फाटा ते नेवासा या खड्डेमय रस्त्यामुळे छोटयामोठ्या अपघाताची मालिका सुरू झाली असून या रस्त्याच्या कामास तातडीने सुरुवात करण्यात यावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांसह व्यापाऱ्यांनी केली आहे. या खराब रस्त्यांमुळे नेमके किती लोकांना जबरी ईजा झाल्याशिवाय प्रशासनाला जाग येणार नाही असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारीला जात आहे.
या रस्त्यावर पडलेले खड्डे पाहुन नक्कीच काही तरी गंभीर घटना घडणारच आहे, हा विचार सर्वांच्या मनात आल्याशिवाय राहत नाही.बर हे सगळे उघड्या डोळ्यांनी पाहून स्वतः ला आमुक तमुकचे कार्यकर्ते म्हणवून घेणारे सुद्धा गप्प का आहेत असा सवाल ही नागरिक विचारू लागले आहे.
पाच किलोमीटर अंतर असलेला नेवासा ते नेवासाफाटा हा नेहमीचा वर्दळीचा रस्ता आहे रोज या रस्त्यावर एक दोन तरी मोटार सायकलीची पडझड होते. त्यामुळे छोट्या छोट्या अपघाताची मालिका सुरू झाली आहे.सर्व सुजाण नागरिकांनी मतमेद,राजकारण बाजुला ठेऊन संबंधित नेत्याचे किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याचे या विषयाकडे गांभीर्याने लक्ष केंद्रित व्हावे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत अशी अपेक्षा ही सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत असून तो याबाबत त्वरित उपाययोजना न झाल्यास त्रिव आंदोलन छेडले जाईल असा ईशारा सामाजिक कार्यकर्ते व व्यापारी विजय दहीवाळकर व गणेश झगरे यांनी दिला आहे.