कृषी कायदे रद्द करण्याच्या निर्णयाचे स्वागत,बळीराजाने दिलेला संघटित लढा प्रेरणादायी
शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
शेतकऱ्यांनी एकजुट दाखवुन आंदोलन केले. देशभर संतापाची लाट उसळली. शेतकऱ्यांचा उद्रेक पाहुन अन्याकारक कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्याच धर्तीवर वाहतूकदार, कष्टकरी, बेघर आदींची देखील जाचक कायद्यतून मुक्तता करावी, असे आवाहन कष्टकरी कामगार पंचायत व महाराष्ट्र वाहतूक पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले.
बाबा कांबळे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमुद केले आहे की, शेतकऱ्यांच्या एकजुटीला सलाम करणे गरजेचे आहे. त्यांनी लढून आपले हक्क मिळविले. आम्ही या लढत सहभागी होतो भेघर कष्टकरी, कामगार, वाहतूकदारांनी देखील शेतकऱ्यांचा आदर्श घेऊन संघर्ष करावा. तीन कृषी कायदा रद्द करावे यासाठी भारतातील शेतकऱ्यांनी एकजुटीने लढा दिला. या लढ्याला विजय प्राप्त झाला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदा रद्द करणार असे जाहीर केले आहे. शेतकरी यांच्या बरोबरीने कामगार कष्टकरी व वाहतूकदार यांनी देखील त्यांच्यासाठी झालेल्या विविध जाचक कायद्यासाठी लढा दिला आहे. कृषी कायदा रद्द झाले. परंतु अजूनही कामगारांसाठी केलेले जाचक कायदे व टेम्पो, बस, ट्रक व रिक्षासह देशातील सर्वच वाहतूक दार, कष्टकऱ्यांसाठी केलेले जाचक कायदे रद्द झालेले नाहीत. यासाठी शेतकऱ्यांचे आदर्श ठेवून देशातील कामगार, कष्टकरी, वाहतूकदारांनी संघर्ष सुरू ठेवणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी केले.
बाबा कांबळे यांनी नमुद केले आहे की, शेतकऱ्यांनी उभा केलेला लढा देशाला दिशा देणारा आहे. देशामध्ये परिवर्तनाचे आणि आंदोलनाचे नवीन चळवळ सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने देशांमध्ये ट्रक, बस टेम्पो डंपर रिक्षा सह वाहतूक करणाऱ्या घटकांसाठी केंद्रीयपरिवहन खात्याच्या अंतर्गत नवीन विधेयक पारित केले आहेत. यामध्ये वाहतूकदारांना आधीक दंड 15 वर्षाच्या वाहन स्क्रॅप करणे, भांडवलदारांना नफा आणि फायदा मिळवून देण्यासाठी रस्त्यांचा वाहतुकीसाठी निलावं करणे असे अनेक जाचक कायदे करून वाहतूकदारांच्या समोर अडचणी व प्रश्न उभे केले आहेत.
याबरोबरच कामगारांसाठी जाचक कायदे करून कुठल्याही परिस्थितीमध्ये कामगारांना कामावर काढण्याचे अधिकार मालकांना दिले आहेत. तसेच कामगारांना कायम न करता त्यांना कंत्राटी पद्धतीने गुलामासारखे वागवण्याचा अधिकार मालकांना दिला आहे. याबरोबरच देशातील बेघर, भाड्याने राहणाऱ्या नागरिकांसाठी घर मालकांना चार पट भाडे घेण्याचे जास्तीचे अधिकार दिले आहेत.या मुळे गोरगरीब स्वतःचे घर नसणारे भाडेकरी यांच्या साठी अडचण निर्माण झाली आहे, कृषीचे तीन कायदे रद्द केले. त्या प्रमाणेच वाहतूकद कष्टकरी कामगार, आणि बेघरांसाठी केलेले जाचक कायदे रद्द करण्यात यावेत. हे कायदे रद्द न केल्यास देशातील करोडो वाहतूकदार, कामगार, बेघर, कष्टकरी जनता तीव्र आंदोलन करेल,असा इशारा देखील यावेळी बाबा कांबळे प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला.