शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड (दि.०१ डिसेंबर) :- कोरोना -१९ पुर्वी विधवा झालेल्या महिलांचे नावे “मिळकत हस्तांतरण शिबीर”यामध्ये समावेश करावे अशी मागणी मनपा विरोधीपक्ष नेते राजू मिसाळ यांनी मनपा आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे .
दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, मनपाच्या करसंकलन विभागाकडील कोरोना -१९ किंवा अन्य कारणाने विधवा झालेल्या महिलांचे नावे मिळकत हस्तांतरण करणेकामी शिबीर आयोजीत करणेत आलेले आहे. या शिबीरामध्ये कोराना नंतरच्या कालावधीतील विधवा महिलांचे नावे मिळकत हस्तांतरीत करणेत येत आहे. परुंतु या शिबीरामध्ये कोरोना पुर्वी विधवा झालेल्या महिलांचे नावे मिळकत हस्तांतरण करणेत येत नाही. शहरामध्ये कोरोनापुर्वी अन्य कारणाने विधवा झालेल्या महिलांचे प्रमाणही लक्षणीय आहे. कोरोना पुर्वी विधवा झालेल्या महिलांचे नावे मिळकत हस्तांतरण करुन घेतले तर अशा महिलांना दिलासा व आधार मिळेल, मनपा कडे मिळकत कर ही जमा होवु शकेल.
शिबीराचा कालावधी पाच दिवसाचा असल्याने अधिकृत कागदपत्रे ,मुत्यू दाखला , ओळखपत्र ईत्यादी जमा करणे विधवा महिलांना जिकरीचे व अडचणीचे होत आहे. शिबीर कालावधीमध्ये वाढ करणेत यावी जेनेकरुन जास्तीत जास्त विधवा महिलांना या शिबीराचा उपयोग होईल.
कोरोना पुर्वी अन्य कारणाने विधवा झालेल्या महिलांना दिलासा देण्याच्या दृष्टीकोनातुन मिळकत हस्तांतरण करावे तसेच शिबीर कालावधी मध्ये वाढ करावी, संबधीत विभागांना आदेश निर्गत करण्यात यावे अशी मागणी पा विरोधीपक्ष नेते राजू मिसाळ यांनी केली आहे .